केंद्र सरकारमध्ये सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर लवकरच परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती करण्याचा निर्णय मोदी सरकारने (Narendra Modi) जाहीर केली आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४५ जागांसाठी जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. या निर्णयानंतर विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत.
यावरून काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती. हा निर्णय म्हणजे अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला आता केंद्र सरकारमधील मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
लोकवाहीनी प्रदेश आणी देश पातळीवर घडणाऱ्या घडामोडींबाबत अचूक वर्णन विश्लेषण करत असते .सामाजिक समस्यांची दखल घेऊन न्याय मिळवून देण्यात लोकवाहीनीची भूमीका महत्वपूर्ण असेल यात तिळमात्र शंका नाही.