महाराष्ट्र (Maharashtra) :-
खरे तर आपल्या भारतीय संस्कृती प्रत्येक सणांना धार्मिक महत्त्वासोबत शास्त्रीय कारणेही(Scientific Reasons) आहेत आता मकरसंक्रांतीला पतंग(Kite) का उडवण्याचंच घ्या ना! तसं बघायला गेले तर लहान मुलांचा हा साधा खेळ. आमच्या लहानपणी आम्ही पेपराच्या कागदाचा घरी पतंग करायचो आणि मांजा दुकानातून विकत आणायचो. आणि मग गल्लीत पतंग उडवायचो. पण जशी जशी मकरसंक्रांत(Makar Sankrant) जवळ यायची, मग तेव्हा आई पतंग घ्यायला रोज एक रुपया द्यायची. का तर मकरसंक्रांतीला पतंग उडवायची पद्धत आहे म्हणून.
पतंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आकाशात उंच भरारी घेतानाचे चित्र येते. पतंगाचा उपयोग शुभ सुरुवातीस केला जातो. म्हणजे त्याला शुभ संकेत समजलं जातं. आपल्याकडे पतंगाला शुभ, स्वातंत्र्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. पतंग उडवताना मोकळ्या आकाशात सूर्याची किरणे आपोआपच अंगावर पडतात, त्यामुळे वेगळे उन्हात जाऊन बसायची वेळ येत नाही.
आता पतंग हे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या चिन्हाचे तयार करतात. जानेवारी महिन्यात निळेशार आकाश रंगीबेरंगी पतंगांनी खुलून निघते. (Indian Culture) पण अनेकाच्या मनाला प्रश्न पडतो पतंग मकरसंक्रांतीलाच का उडवला जातो? याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे.
खर तर मकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. तेव्हा आपल्या शरीराला ऊनही फार कमी मिळते आणि आपसूकच थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा कोरडी पडते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
पतंग उडवायच्या निमित्ताने का होईना थंडीतून लोक घराबाहेर पडतात. घराच्या गच्चीवर मोकळया पटागंणात येऊन पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. त्यामुळे पुरेपुर ऊन शरीराला मिळते. पण पतंग फक्त भारतातच उडवला जातो असे नाही बरं का…
इतर देशांमध्ये पतंग उडवला जातो. असं म्हणतात की, फार पूर्वी अफगाणिस्तानमध्येही पतंग (KITE) उडवायचा हा खेळ खेळला जायचा. पण सध्या तालिबानने या खेळावर पूर्णपणे बंदी घातली आ हे.त्यासोबत पाकिस्तान आणि चिनमध्येही पतंग उडवले जायचे.