41 जणांचा मृत्यू तर 400 बेपत्ता
वायनाड (Wayanad) :- केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री उशिरा चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. यामध्ये 4 गावे वाहून गेली. घरे, पूल, रस्ते आणि वाहनेही वाहून गेली. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 रूग्णालयात आहेत, तर 400 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ही घटना रात्री उशिरा 2 वाजता घडली.बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी हजर आहेत. कन्नूरमधील 225 लष्करी जवानांना वायनाडला पाठवण्यात आले आहे. (Kerala) यामध्ये वैद्यकीय पथकाचाही समावेश आहे.
याशिवाय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरही बचाव कार्यात गुंतले आहेत.वायनाडमधील मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये याच गावात दरड कोसळली होती, ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला होता. 5 जणांचा शोध लागला नव्हता. 52 घरे उद्ध्वस्त झाली होती.वायनाड व्यतिरिक्त हवामान खात्याने आज कोझिकोड, मलप्पुरम आणि कासारगोडमध्येही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच आजही येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येऊ शकतात.