नागपूर (Nagpur) :- राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील एकूण प्रकल्पांमध्ये सध्या 75 टक्के जलसाठा आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये हा साठा अधिक आहे मागील वर्षी याच काळात 63 टक्के इतका जलसाठा होता नागपूर विभागांमध्ये एकूण धरणांची संख्या 383 इतकी असून 80 टक्के जलसाठा भरलेला आहे अमरावती विभागामध्ये 264 धरणांची संख्या असून 71 टक्के जलसाठा भरलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 920 धरणांची संख्या असून 42 टक्के धरण भरलेले आहेत नाशिक विभागामध्ये 537 धरणांची संख्या असून 73% तर पुणे विभागांमध्ये 720 धरणांची संख्या असून ८८ टक्के धरण साठा भरलेला आहे. आणि कोकण विभागामध्ये 173 धरणांची संख्या असून 92 टक्के जलसाठ जलसाठा आजच्या घडीला आहे.
नागपूर जिल्ह्यातील एकूण धरणांची संख्या 16 असून सद्यस्थितीमध्ये 80 टक्के जलसाठा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये १० धरणे असून इथे 70 टक्के जलसाठा आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये 44 मोठी धरणे असून 37% जनसाठा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये 22 धरणांची संख्या असून इथे 87 टक्के जलसाठा आहे पुणे जिल्ह्यामध्ये 35 धरणे असून 95 टक्के जलसाठा आहे आणि कोकण विभागामध्ये 11 धरणांची संख्या असून 96 टक्के जलसाठा आहे.
राज्यभरातील मध्यम प्रकल्पामध्ये नागपूर विभागातील 42 धरणांमध्ये 84 टक्के जलसाठा आहे अमरावती विभागामध्ये 25 मध्यम प्रकल्प असून 80 टक्के जलसाठा आहे छत्रपती संभाजीनगर क्षेत्रामध्ये 81 धरणांची संख्या असून 39% धरण भरलेले आहेत नाशिक विभागामध्ये 54 धरणांची संख्या असून 59% धरण जलसाठा भरलायला आहे पुणे विभागात 50 धरणांची संख्येत 72 टक्के तर कोकण विभागामध्ये आठ मध्यम प्रकल्प असून अठ्ठ्यांशी टक्के जलसाठा आहे.