Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

तीन अपक्ष आमदार राजीनामा देत भाजपच्या चिन्हावर लढले | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

तीन अपक्ष आमदार राजीनामा देत भाजपच्या चिन्हावर लढले

काँग्रेसकडून दोघांना पराभवाचा धक्का, एकाचा विजय

देशातील विविध राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. पश्चिम बंगालमध्ये चार जागांवर तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला.काँग्रेसनं हिमाचल प्रदेशमधील तीन पैकी दोन आणि उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर विजय मिळवला. बिहारमध्ये जदयू आणि राजदला धक्का बसला असून तिथं अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला. पंजाबमध्ये आपचा उमेदवार विजयी झाला. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं विजय मिळवला. तर, तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या उमेदवारानं विजय मिळवला.
—————
महेंद्र दळवी चिखलात लोळले, जयंत पाटलांचा पराभव

शिंदे गटाच्या आमदाराचा आनंद गगनात मावेना

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीकडून आणि खासकरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जयंत पाटील यांनी निवडणूक लढली. मात्र, जयंत पाटील यांना अवघ्या बारा मतांवर समाधान मानावे लागले. जयंत पाटील यांचा पराभव झाला. मात्र त्याचा सर्वात जास्त आनंद अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना झालाय. महेंद्र दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय.
————–
विधानसभेसाठी मविआचे 2 उमेदवार ठरले

निलेश लंकेंच्या पत्नीच्या नावाची घोषणा!

अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी भाषण करताना सांगितले की , शिवसेनेला आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले असून लोकसभेत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे आता विधानसभेतही हीच जादू चालणार असून शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके विधानसभेत जातील. संजय राऊतांनी लंके आणि पाचपुते यांच्याबाबत असे वक्तव्य करून जणू काही श्रीगोंद्याचा विधान सभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला असेच म्हणता येईल.
————

 

सिटी बसने चौघांना चिरडले

9 वर्षीय चिमुकल्याचा जागेवर मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

अमरावती शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात एका सिटी बसचा भीषण अपघात झाला असून यात भरधाव सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडलीय. यात एका 9 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश असून त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडलीय. त्यामुळे अमरावतीत देखील आज नव्यानं हीट अँड रनची घटना घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
————–
मोदी यांच्या हस्ते 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याने मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार

विधानसभा निवडणूकाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरेगाव नेस्को येथील कार्यक्रमात सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यात महत्वाकांक्षी ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्यांच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या बोगद्यांमुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी टळून ठाण्यातून बोरीवलीला अर्ध्या तासांत पोहचता येणार आहे. सीएसएमटी येथील 10 आणि 11 फलाटांच्या लांबी वाढविल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांचे डबे वाढणार आहे.त्यामुळे जादा प्रवाशांची सोय होणार आहे.
—————
अजित पवारांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’ला नव्यानं आव्हान,

शिखर बँक घोटाळ्यात सात कारखान्यांची कोर्टात धाव!

शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या ‘क्लीन चिट’ला नव्यानं आव्हान देण्यात आले आहे. अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे.
—————–
मराठा आरक्षणाची डेडलाईन संपायला अवघे काही तास उरले…

शंभुराज देसाई यांचं आरक्षणाबाबत महत्वाचं विधान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेली डेडलाईन संपायला अवघे काही तास उरले आहेत. असं असतानाच मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती. परंतु एकच महिन्यांचा कालावधी त्यांनी दिला. एक महिन्यात त्यांना आम्ही भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles