Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Eknath Shinde:हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम,आमच्या कामाची पोचपावती

मुंबई (Mumbai) :- राज्यात महायुतीला लोकांनी जो कल दिला आहे ते लाडक्या बहिणीचे प्रेम आहे, अडीच वर्षे केलेल्या कामाची पोचपावती आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही, मुख्यमंत्रिबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांचा हा कल महायुतीला मिळाला आहे. आम्हाला लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी मतदान केलं. त्यामुळे लाडक्या बहिणींचे आभार. समाजातल्या प्रत्येक घटकाने आम्हाला मतदान केलं. गेले अडीच वर्षे आम्ही जे काम केलं त्याची ही पोचपावती आहे. मी लोकांचे आभार मानतो. पुढच्या कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे.

ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते म्हणाले की, ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक जागा या भाजपच्या येणार असल्याचं चित्र आहे. एकट्याच्या भाजपच्या 125 हून अधिक जागा येतील असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी भाजपचा उमेदवार असेल असा दावा केला जात आहे.

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रिपदी शिंदे गटाचा दावा असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाच्या शितल म्हात्रे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे महायुतीला एवढं यश मिळालं. महायुतीने या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. लाडकी बहीण ही त्यांची योजना होती. त्यामुळेच महायुतीला हे यश मिळालं आहे

Mumbai City
Mumbai map
Breaking News Mumbai Today Live
Mumbai News
News Today Mumbai
Population of Mumbai in crores
Mumbai district Name
Mumbai population

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles