ध्वनी प्रदूषणामुळे वाढता त्रास
नागपूर , 27 मे, : आपण अलीकडे बघत आलो आहे. बिमारी चं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आला आहे…आपल्याला माहित आहे की आवाज हा उर्जेचा एक प्रकार आहे. कधी कधी आवाज ऐकायला सुखदायक आणि काही वेळा मोठ्याने ऐकायला मिळतो…त्यात प्रामुख्याने वाहतुकीचा आवाज असतो जो अलिकडच्या वर्षांत वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वाढला आहे. ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याने वृद्ध व्यक्तींना बहिरेपणा, डोकेदुखी, उच्च रक्तदाब रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या हे ध्वनी प्रदूषणाचे दुसरे कारण आहे.आणि तसेच औद्योगिकीकरणामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे कारण जनरेटर, गिरण्या, प्रचंड एक्झॉस्ट फॅन यांसारख्या अवजड यंत्रांचा वापर केला जातो, परिणामी अवांछित आवाजाची निर्मिती होते.अशा करणा मुडे वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी…. पोलीस आयुक्त नागपूर शहर वाहतूक विभाग.. यांनी ‘ कृपया हॉल वाजू नका(Do not ring the hall) ‘Don’t pushpa the horn…. असा एक उपक्रम राबविण्यात आला आहे .
ध्वनिप्रदूषण म्हणजे प्राणी, मनुष्य, यंत्र यांच्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मनुष्य किंवा प्राणी यांना बाधा पोचविणाऱ्या आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती. ध्वनिप्रदूषणाचे मुख्य स्रोत परिवहन प्रणाली, आवाज करणारी यंत्रसामग्री, लोकांचा गोंगाट, वाद्यांचे आवाज वगैरे असे आहे. या व्यतिरिक्त गाड्यांचे हॉर्न, सायरन, फटाके, गिरण्यांचे भोंगे, ध्वनिवर्धकांचे आवाज, रेडिओ-दूरचित्रवाणी संचांतून बाहेर पडलेले आवाज या सर्व गोष्टी ध्वनिप्रदूषण वाढण्यास मदत करतात. विविध मीडियांमुळे आवाजाचा गोंगाट वाढला आहे आणि त्याचा विपरित परिणाम दिसून येतो.
ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम
उच्च रक्तदाब: हा ध्वनी प्रदूषणाचा थेट परिणाम आहे जो दीर्घ कालावधीसाठी वाढलेल्या रक्त पातळीमुळे होतो.
श्रवणशक्ती कमी होणे: मानवी कानांच्या आवाजाच्या मर्यादेपलीकडे असलेल्या मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात आल्याने कानाच्या पडद्याचे नुकसान होते, परिणामी श्रवणशक्ती कमी होते.