कुणाचा होऊ शकतो गेम? थेटच सांगितलं
विधान परिषदेच्या (Legislative Council) 11 जागांसाठी 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आता लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आमदारांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचे मतं अशा हिशोबाने मतमोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणी नेमकी कशी होते? . “विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया थोडी किचकट असते. पण थोडक्यात समजवून सांगायचे तर सर्व उमेदवार जितक्या जागा असते तितके उभे राहिले असते तर निवडणुकीचा प्रश्न उभा राहिला नसता. निवडणूक झाली नसती. प्रत्येकाला 1 जागा मिळू शकली असती. पण जिथे निवडणूक लढण्यासाठी जास्त लोकं आलेली आहेत, अशा परिस्थितीत कुणीतरी एलिमिनेट व्हावं लागतं”, असं श्रीहरी अणे (Srihari Ane) यांनी सांगितलं.
आता कुणाला एलिमिनेट करायचं हे ठरवण्यासाठी सिंगल प्रेपरेशन ट्रान्सफरेबल व्होट नावाचा फॉर्म्युला असतो. तो आपल्या कायद्यातच दिलेला आहे. त्या फॉर्म्युला प्रमाणे एक कोटा ठरवण्यात येतो की, कमीत कमी इतकी पहिल्या पसंतीची मते मिळाली की, एखादा उमेदवार निवडून येईल. आज तो कोटा हा 23 मतांचा आहे. याचाच अर्थ आज जे आमदार मतं देत आहेत त्यांच्यापैकी 23 आमदारांनी पहिली पसंती एका उमेदवाराला दिली तर तो उमेदवार जिंकणार आहे. आता एकाच राऊंडमध्ये सर्व 23 मते उमेदवाराला मिळू शकतात किंवा मिळू शकणार नाहीत. जर नीट नियोजन केलं तर 23 मिळू शकतं. काँग्रेसकडे आज 37 मतं आहेत. पण त्यांनी एकच उमेदवार दिल्याने त्यांचा उमेदवार जर क्रॉस व्होटिंग झालं नाही तर निश्चितपणे निवडून येऊ शकतो”, अशी माहिती श्रीहरी अणे यांनी दिली.
“एखादा आमदार आपल्या शत्रू पक्षाच्या उमेदवारालाही दुसऱ्या पसंतीचं मत देऊ शकतो. असं जर झालं तर हा फॉर्म्युला चालू शकत नाही. अशी होण्याची यावेळी दाट शक्यता आहे. त्याला कारणं अनेक आहे. मी राजकीय कारणात जात नाही. काही महिन्यांपूर्वी एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी (nationalist) होती. त्यांचे आमदार आणि नेते यांच्यातील सलोखे, लागोबांधे लक्षात घेऊन आज जरी मी शिवसेना शिंदे गटात असेल तरी माझी दुसरी पसंतीचं मत हे शिवसेना ठाकरे गटाला देण्याची शक्यता आहे”, असा मोठा दावा श्रीहरी अणे यांनी केला.