अहमदनगर, 10 जुलै:- नगर जिल्ह्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे,यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाडिया पार्क येथे खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५१ कोटीचा विकास आराखडा मंजूर झाला असून यातील १५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.पूर्वी क्रीडा क्षेत्राला म्हणावे तेवढे महत्त्व नव्हते.आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झाले आहे.क्रीडा चित्रपटाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळत आहे.चांगला खेळाडू आपल्या सर्वांना मिळून घडवायचा आहे.नगर जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करत देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिले आहे.अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या माध्यमातून ५६ क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत आहे.खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम प्रेक्षक वर्गातून होत असते.मुंबई येथे भारतीय क्रिकेट टीमने २० -२० वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केले.त्या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा व प्रेरणा मिळत असते.अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनने सर्व समावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे,असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे,ज्ञानेश्वर खरंगे,निर्मल थोरात,विलास दवणे,प्रा.संतोष भुजबळ, रावसाहेब बाबर,संजय धोपावकर,अविनाश काळे,प्रशांत गंधे,निलेश कुलकर्णी,विशाल गर्जे,सतीश झेंडे,शैलेश गवळी,निलेश मदने आदींसह खेळाडू व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे म्हणले की,आपण सर्वजण एकत्र आलो तर खेळाडू घडले जातात.खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी त्यांचे काम केले आहे.आता आपल्या सर्वांना खेळाडूंसाठी काम करावे लागेल असे ते म्हणाले.