जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच पाकिस्तानचे अनेक हवाई तळही उद्ध्वस्त केले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा झाली.
भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) यशानंतर आता या धर्तीवर एक पार्क बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्कचे नाव सिंदूर वन असे असणार आहे. हे पार्क गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बांधले जाणार आहे. या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. त्याच ठिकाणी या पार्कची उभारणी केली जाणार आहे.