Sunday, June 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले, तरी मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मागील ५६ वर्षांपासून काम करीत आहे. सध्याच्या घडीला असा एक तरी असा माणूस दाखवावा,’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले, तरी मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मागील ५६ वर्षांपासून काम करीत आहे. सध्याच्या घडीला असा एक तरी असा माणूस दाखवावा,’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.मी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही दहा वर्षांच्या काळात काय केले हे आधी पाहावे, असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही, तर ते देश काय सांभाळतील. दहा वर्षात कांद्याच्या प्रश्नांसाठी पवारांनी काय केले या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे. त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले की, मी कृषिमंत्री असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचा राज्यातील शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. एकदा मी इस्राईलला निघालो होतो. तेव्हा मोदींचा मला फोन आला होता.

अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारला होता. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार मी माझ्याबरोबर त्यांना इस्राईलला घेऊन गेलो होते. तेथील शेतीचे नवे तंत्रज्ञान त्यांना दाखवले. त्यावेळी मोदींना राज्याच्या विकासात मनापासून रस होता. पण हल्ली त्यांना फक्त राजकारणात रस आहे, असे सांगत पवारांनी मोदींना फटकारले.

राज यांच्याबद्दल माहीत नाही

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही. मी ऐकलंय की, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत. एवढे सांगून पवारांनी राज यांच्याबद्दल अधिक बोलणे टाळले.

हे शहाणपणाचे लक्षण नाही

‘मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे शहाणपणाचे लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावे लागते, वाहतूक कोंडी होते. मोदी यांनी ‘रोड शो’ केला तेथे गुजराती नागरिकांची संख्या जास्त आहे. मोदींना ‘रोड शो’ करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचे लक्ष्य विशिष्ट वर्ग होता. मात्र, त्यामुळे लोकांना त्रास झाला,’ अशी टीका पवार यांनी केली.

घोषणाबाजी करणाऱ्याचे कौतुक

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना शेतकऱ्याने कांद्यावर बोला, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी किरण सानप या तरुणाला ताब्यात घेतले. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, मोदींना कांद्यावर बोला, असे तरुण शेतकऱ्यांनी सांगणे योग्यच आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का हे मला माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles