नागपूर (Nagpur) 08 ऑगस्ट:- बांगलादेशातील घटनाक्रम आणि हिंसाचार निंदनीय आहे. अशा अमानवीय शक्तिंचा हिंदू समाजाने सतर्क होऊन संघटितपणे सामना करावा असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताकुमारी (Shantaka ) यांनी केले.
बांगलादेशात अमानुष शक्तींनी सरकार उलथवून देशभर हिंसाचार पसरवला आहे. परिणामी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बांगलादेशातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यानंतर कट्टरपंथी जिहादींनी तेथील अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. जिहादीं तेथील हिंदुंची प्रतिष्ठान, घरे, मंदिरे आणि गुरुद्वारांची तोडफोड आणि लूट करत आहेत.
बांगलादेशात (Bangladesh) जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हिंसाचाराचे तांडव झाले आहे. यासंदर्भात राष्ट्र सेविका समितीकडून निवेदन समोर आले आहे. बांगलादेशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार हटवणे आणि शांतताप्रिय हिंदूंवर होणारे अत्याचार निंदनीय असल्याचे राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी गुरुवारी सांगितले. शांताक्का म्हणाल्या की, बांगलादेशात घडणाऱ्या घटनांचे विपरीत परिणाम भारतातही जाणवत आहेत. भारतातही तरुण पिढीच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. भारतातील हिंदूंनीही संघटित होऊन अशा प्रवृत्तींचा मुकाबला करावा, असे आवाहन मुख्य संचालकांनी केले. भारतीय समाजाने देखील सजग राहून भारताला बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे शांताक्का यांनी सांगितले