Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे

मुंबई :- विधानसभेचे पावसाळी अधिवेश आज गुरूवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 आमदारांचे राजीनामे मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हे आमदार कोण याची माहितीही त्यांनी विधानसभेला दिली. आमदार असलेले सात जण लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर लोकसभा लढवण्यासाठी राजू पारवे यांनी आधीच राजीनामा दिला होता. पण त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, बळवंत वानखडे आणि प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून तर प्रणिती शिंदे सोलापूर, बळवंत वानखडे अमरावती आणि प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली. राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह 8 आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles