काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊतांची मागणी
नागपूर :- राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली.
२०१८ मध्ये राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी केले. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असे नाव दिले. दादर स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करावे, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचे नाव चैत्यभूमी करावे, अशी आग्रही मागणी डॉ. राऊत यांनी आज सभागृहात केली.