देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांना त्यांचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडताना दिसतय. बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावले, आपण का करू शकत नाही? असा वादग्रस्त सवाल त्यांनी शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात केला होता. दरम्यान या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून सांगलीतील भाजपने त्या नीता केळकर यांनी राजू शेट्टींच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसंच राजू शेट्टींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात येतेय.
काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून (Bangladesh) लोकांनी काहीतरी शिकावं असं म्हणत राजू शेट्टींनी बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही, असा वादग्रस्त सवाल केला होता. या वक्तव्याने आता नववा वाद निर्माण होताना दिसत आहे.
माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशपासून काहीतरी शिकावं, आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलत होते. शेतकरी सहविचार सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काही तरी शिकावं. जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही.