जयपूर (Jaipur) 17 जुलै:- राजस्थानात मुख्यमंत्री वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आज,बुधवारी सकाळी जयपूर विभागात शिक्षण विभागातर्फे सुमारे 10 लाख रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे सकाळी 6 ते 9 या तीन तासात हा विक्रम करण्यात आला. याबाबत विभागीय आयुक्त डॉ.आरुषी मलिक यांनी सांगितले की, मोहिमेंतर्गत बुधवारी 9 लाख 92 हजार 241 रोपांची लागवड करण्यात आली असून त्यात जयपूर जिल्ह्यात 50 हजार 104, जयपूर ग्रामीण जिल्ह्यात 1 लाख 45 हजार, दौसा जिल्ह्यात 3 लाख 45 हजार 243 अलवर जिल्ह्यात 3 लाख 26 हजार 978 रोपे, कोटपुतली-बेहरोर जिल्ह्यात 81 हजार 923, खैरथल-तिजारा जिल्ह्यात 23 हजार 953 आणि दुडू जिल्ह्यात 19 हजार 40 रोपांची लागवड करण्यात आली आहे.
राज्यातील वृक्षांची कमतरता आणि वाढते तापमान पाहता राज्य शासनाकडून पावसाळ्यात सघन वृक्षलागवड करण्यात येत आहे. वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांना शासकीय शाळांमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोहिमेअंतर्गत आवश्यकतेनुसार रोपे उपलब्ध करून देण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच वृक्षारोपणानंतर रोपांची सुरक्षितता आणि पुरेशा पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.