Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

President : राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम करण्याची गरज

नवी दिल्ली (New Delhi) 27 जून :- पक्ष आणि राजकारण यापलिकडे जाऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. राष्ट्रपतींनी आज, गुरुवारी अठराव्या लोकसभेच्या अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी नीट-पेपर लीकवरून विरोधकांनी गोंधळ घातला त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी उपरोक्त विधान केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी नीट पेपर लीकच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ घातला. राष्ट्रपतींनी विरोधी खासदारांना थांबण्यास सांगितले पण ते थांबले नाहीत. यावर राष्ट्रपती म्हणाल्या की, नीट पेपर लीक होण्यापूर्वीही अनेक राज्यांमध्ये पेपर फुटण्याच्या घटना समोर आल्या होत्या. अशा परिस्थितीत पक्ष किंवा राजकारण याच्या वर जाऊन काम करण्याची गरज आहे. चौकशीतूनच जबाबदारी निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पक्ष आणि राजकारण यापलिकडे जाऊन काम करण्याची गरज राष्ट्रपतींनी नमूद केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकार भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. देशात सुमारे 60 वर्षांनी पूर्ण बहुमत असलेले स्थिर सरकार स्थापन झाले आहे. जनतेने या सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. लोकांना याची जाणीव आहे. हे सरकार प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षा पूर्ण करू शकते. 18वी लोकसभा(Lok Sabha) ही अनेक अर्थाने ऐतिहासिक लोकसभा आहे. या लोकसभेची स्थापना अमृतकाळाच्या सुरुवातीच्या काळात झाली. आगामी अधिवेशनात हे सरकार या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प सरकारच्या आर्थिक आणि दूरगामी धोरणांचा तसेच भविष्यवादी दृष्टिकोनाचा प्रभावी दस्तऐवज ठरणार असल्याचे मुर्मू यांनी सांगितले. तसेच ‘जगभरातील लोकांनी सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुका पाहिल्या आहेत. सुमारे 64 कोटी मतदारांनी उत्साहाने आपले कर्तव्य बजावले आहे. यावेळीही महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला. या निवडणुकीचे अत्यंत सुखद चित्र जम्मू-काश्मीरमधूनही समोर आले आहे. काश्मीर खोऱ्यात अनेक दशकांचे मतदानाचे रेकॉर्ड मोडल्याचे राष्ट्रपती म्हणाल्यात.

सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. गेल्या 10 वर्षात भारत 11 व्या स्थानावरून 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोना महामारी आणि विविध संघर्ष असूनही, भारताचा हा विकास दर आहे. गेल्या 10 वर्षात केलेल्या सुधारणांमुळे आज भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. विकसित भारताची निर्मिती तेव्हाच शक्य आहे जेव्हा देशातील गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी सक्षम होतील. त्यामुळे माझ्या सरकारकडून त्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यांना प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. एकही व्यक्ती सरकारी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी भारत इच्छाशक्तीने काम करत आहे. सरकारी योजनांमुळे गेल्या 10 वर्षात 25 कोटी भारतीय गरिबीतून बाहेर आले आहेत. माझे सरकार अपंग बंधू आणि भगिनींसाठी स्वस्त आणि स्वदेशी सहाय्यक उपकरणे विकसित करत आहे. माझे सरकार कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना एकत्रित करून अपघात आणि जीवन विम्याचे कव्हरेज वाढविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानात गरिबांचे जीवन आणि त्यांचे आरोग्य हा राष्ट्रीय महत्त्वाचा विषय बनला आहे. करोडो गोरगरीबांसाठी प्रथमच शौचालये बांधण्यात आली आल्याचे त्या म्हणाल्यात. सक्षम भारतासाठी आपल्या सशस्त्र दलांमध्ये आधुनिकता अवश्यक असल्याचे सांगताना राष्ट्रपती म्हणाल्या की, युद्धाच्या परिस्थितीतही आपण सर्वोत्तम राहता यावे, यासाठी सशस्त्र दलांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. या मानसिकतेतून मी सरकारने अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्वीकारल्या. गेल्या 10 वर्षात भारत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या संरक्षण उत्पादनात गुंतला आहे, गेल्या दशकात आपली संरक्षण निर्यात 18 पटीने वाढून 21 हजार कोटी रुपये झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles