Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

यात्रेकरूंची बस नदीत कोसळून 14 ठार | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

यात्रेकरूंची बस नदीत कोसळून 14 ठार

नेपाळची धक्कादायक घटना

महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक बालकही आहे. 31 जण जखमी आहेत. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती व यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत पडली . तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. जिल्ह्याचे एसपी बीरेंद्र शाही म्हणाले – बस मर्स्यांगडी अंबुखैरेनीजवळ नदीत पडली आहे. स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. लष्कर आणि सशस्त्र दलांनाही सतर्क करण्यात आले आहे
——–

महाराष्ट्र बंद कोर्टाने ठरविले अवैध
कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणात सुनावणीत करताना विरोधी पक्षांनी पुकारलेला 24 ऑगस्टचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उद्याच्या बंदविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे. आम्ही विकृतीचे विरोधक आहोत. कोणत्याही राजकीय पक्षांचा नाही तर सर्व नागरिकांच्यावतीने उद्याचा बंद आम्ही करत आहे. सर्व भेद विसरून उद्या बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केले आहे.

———–

 

उद्धव ठाकरे, शरद पवार यांना झटका

महाराष्ट बंद बाबत सर्वात मोठी अपडेट

बदलापूर अत्याचार घटनेनंतर राज्याचे राजकारण चांगलचे तापले आहे. महाविकास आघाडीने शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या महाविकास आघाडी जबरदस्त झटका दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही अशी टिपण्णी कोर्टाने केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत.
———–

अनिल अंबानी 5 वर्षांसाठी शेअर बाजारातून बॅन

25 कोटींचा दंडही ठोठावला

बाजार नियामक सेबीनं उद्योजक मुकेश अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. बाजार नियामक सेबीनं त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय त्यांच्यावर ५ वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घालण्यात आलीये. अनिल अंबानी यांच्याव्यतिरिक्त रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह अन्य २४ कंपन्यांवर सेबीनं कंपनीकडून पैसे वळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.सेबीच्या या कारवाईनंतर अनिल अंबानी कोणत्याही लिस्टेड कंपनी किंवा मार्केट रेग्युलेटरकडे रजिस्टर्ड कोणत्याही मध्यस्थात संचालक किंवा मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी (केएमपी) म्हणून ५ वर्षे सिक्युरिटीज मार्केटमध्ये सामील होऊ शकणार नाहीत. याशिवाय रिलायन्स होम फायनान्सवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली असून त्यावर सहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
———–

केंद्रीय आरोग्य विभागाची 156 एफडीसी औषधांवर बंदी

आता मेडिकल स्टोअर्समधून ही औषधे विकता येणार नाहीत

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने 156 एफडीसी औषधांवर बंदी घातली आहे. याबाबत सरकार आणि आरोग्य विभागाकडून मागच्या बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होते. दरम्यान, लोकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने काही निवडक औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांच्या कॉम्बिनेशनचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी माहितीही समोर आली आहे.जी औषधे दोन किंवा अधिक औधषांचे रसायन एका विशिष्ट्य प्रमाणात वापरून तयार केली जातात, त्यांना एफडीसी म्हटले जाते. सध्या देशामध्ये अशा औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. दरम्यान, ताप, सर्दी, अॅलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारांवर उपचार ठरणारी 156 एफडीसी औषधांवर बंदी घातली आहे.
————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles