Sunday, June 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

पाकव्यक्त काश्मीर हा भारताचा भाग

नाशिक : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आपली भूमिका कायम असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, असे स्पष्ट प्रतीपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज येथे केले.भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंंकर यांची प्रकट मुलाखत व प्रशनोत्तराचा कार्यक्रम आज कॉलेजरोड वरील गुरुदक्षिणा हॉल मध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ, देवयानी फरांदे, संयोजक श्वास फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप पेशकार , श्रीराम दांंडेकर, विजय चैाथाईवाले, आदीसह उद्योजक, शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थीत होते. प्रकट मुलाखतीचा दुर्मिळ कार्यक्रमाने नाशिककराना परराष्ट्र व्यवहाराचे सखोल ज्ञानही यामुळे मिळाले. डॉ. जयशंकर म्हणाले की, कलम 370 हटवील्यानंतर काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत.लोकांची मानसीकता बदलुन भारताकडे कल वाढु लागला आहे. एक दिवस तोही भाग भारताशी जोडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चीनच्या ताब्यात भारताची भूमी विषयी ते म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो 1958 ते 1963 या काळात. त्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. मात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करीत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर फोडत आहे. आज देशात दररोज 28 किमी लांब महामार्ग आणि 14 किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. देशाचा जीडीपीसात ट्क्के आहे. प्रशासकीय कारभारात सुधारणा होऊन भ्रष्ट्राचारला आळा बसला आहे. त्यामुळे परराष्ट्रात भारताची प्रतीमा निश्चीत उंंचावली आहे. मुस्लीम देशात मंदीरासाठी जागा दिली जाते. हे त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे.आत्मनिर्भर भारतामुळे औद्योगीक प्रगती होत आहे.संशोधनाला बळ दिल्याने पहील्यांंंदा 5जी चा निर्माता भारत झाला आहे. शंभर देेशाना कोरोना प्रतीबंधक लस भारताने पुरवीली आहे. त्यामुळे अंतराष्ट्रीय स्तारवर गेल्या दहा वर्षात भारताचे स्थान निश्चीत उंचावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कॅनडाच्या संबंधा विषयी ते म्हणाले की, त्यांच्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. पण, ते कधीही पुरावे देत नाही. फक्त आरोप करण्यापेक्षा कॅनडा सरकारने पुरा वे सादर करावे. त्यांनी आतापर्यंतर्यं असा कुठलाही पुरावा दिला नाही, यावेळी त्यांनी श्रोत्यनीविचारलेया प्रस्नाना उत्तरे दिली. आभार अनील भालेराव यांनी मानले.

आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर

ऊर्जा समृद्ध इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित, ओमानच्या आखातावरील चाबहार बंदर आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाचा रस्ता आणि रेल्वे प्रकल्प वापरून भारतीय मालाला लँडलॉक अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवेशद्वार प्रदान करणार आहे. . भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपमधील मालवाहतुकीसाठी बहु-मोड वाहतूक प्रकल्प – भारत आणि इराणने 7,200 किमी लांबीच्या कॉरिडॉर साठी हे बंदर एक प्रमुख केंद्र राहणार आहे.असे डॉ. जयशंकर यानी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles