One Nation One Electionमुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार
मदर ऑफ पॉलिटिकल रिफॉर्मस
निश्चलनीकरण, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 रद्द करणे यासारख्या मोदी सरकारच्या धक्कातंत्राच्या मालिकेत आणखी एका निर्णयाची भर पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी एक असणाऱ्या ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation One Election) धोरणाची देशात अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल पडले आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने One Nation One Election या धोरणाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. एक देश एक निवडणूक धोरणामुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.
———-
नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाणेरड्या राजकरणात व्यस्त
नागपुरात 8 वर्षीय चिमुकल्या मुलीवर 20 रुपयाचे आमिष देऊन लहान बहिणीसमोर अत्याचार घडल्याची घडली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. निर्लज्ज, गद्दार मुख्यमंत्री सध्या सेलेब्रिटींसोबत फोटो काढण्यात व्यस्त आहेत, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाणेरडं राजकारण करण्यात व्यस्त आहे. सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
——–
28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक
पुण्यातील विसर्जन मिरवणूक अखेर 28 तासांनंतर संपली आहे.शेवटच्या मंडळाच्या गणपती विसर्जन बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास करण्यात आले. त्याचबरोबर मिरवणूक शांततेत पार पडल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी विना अडचण मिरवणूक पार पडली…मोठ्या प्रमाणावर नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितलंय. लेझरच्या वापरावर बंदी होती तरीही ज्या मंडळांनी लेझरचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलंय…तसेच आवाजाच्या तीव्रतेचं उल्लंघन केलं असल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणालेत…मोबाईल चोरीच्याही घटना घडल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं
————-
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना २१ सप्टेंबरला आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. यासोबतच आम आदमी पक्षाच्या काही आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. तसेच, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आम आदमी पक्षाच्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत. दरम्यान, याआधी मंगळवारी आतिशी यांनी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. यानंतर उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी आतिशी यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले
———
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात
राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न समोर आला असून, तो गंभीर असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ऑगस्टमध्ये मी स्वतः म्हटलो होतो की, राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची रणनिती आखली जात आहे. तर लोकांनी मला म्हटलं की तुम्ही हवेत गप्पा करत आहेत. पण परदेशात याचं प्लॅनिंग केलं जात असून, देशात त्याची अंमलबजावणी होत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
———–
चांद्रयान-४’ मोहिमेला मंत्रिमंडळाची मंजुरी
मोहिमेसाठी २ हजार १०४ कोटींची तरतूद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (१८ सप्टेंबर) केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी चांद्रयान मोहिमेबाबतही केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आता ‘चांद्रयान-४’ या मोहिमेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-४’ मोहिमेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमावर सरकारने मंजुरी दिली आहे.