Friday, August 1, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज

महाराष्ट्र (Maharashra) :- महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल होणार आहे. राज्यात उष्णतेचा अलर्ट दिला आहे. त्याचवेळी काही भागांत गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे. मुंबईतील तापमानात वाढ होत आहे. तसेच मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याच्या अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशावर पोहचले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 27 एप्रिलला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी दिला आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना 28 एप्रिलला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नागपुरात गेल्या चार दिवसांपासून पारा 44 अंशावर आहे. वातावरणातील कोरडेपणामुळे उन्हाची तीव्रता अधिक आहे. 26 ते 29 एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणामुळे नागपुरातील तापमानात एक किंवा दोन अंशाची घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपुरात 45.4 आणि अकोल्यात 45.1 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles