Thursday, June 19, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या केंद्रातील सरकारला सत्तेत येऊन ११ वर्षे झाली आहेत. गेल्या ११ वर्षांत अनेक स्तरांवर विविध प्रकारचे विक्रम सरकारने रचले आहेत. अयोध्येतील राम मंदिर ते ऑपरेशन सिंदूर हा पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा आलेख वाढत गेलेला पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने देशातील गरिबी, बेरोजगारी अशा अनेकविध मुद्द्यांवर बोट ठेवून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच भारतातील गरिबीबाबत एक अहवाल आला आहे. यातील आकडेवारीमुळे भारतातील गरिबी कमी झाली का, किती कमी झाली, याबाबत सविस्तर आकडेवारी मांडल्याचे सांगितले जात आहे.

भारत वेगाने विकास करत असून, अलीकडेच जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. यातच आता जागतिक बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गरिबीविरुद्धच्या लढाईत मोठा विजय मिळवला आहे. गेल्या ११ वर्षांत भारतातील अत्यंतिक गरिबांची संख्या २७.१ टक्क्यांवरून फक्त ५.३ टक्क्यांवर आली आहे, असे या अहवालात आकडेवारीसह सांगण्यात आले आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये भारतातील अत्यंतिक गरिबी ५.३ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. गेल्या दशकात म्हणजेच २०११-१२ मध्ये देशात अत्यंत गरिबीत जगणाऱ्या नागरिकांचा दर २७.१ टक्क्यांवर होता. तो आता ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बँकेने त्यांच्या दारिद्र्यरेषेच्या मर्यादेत दररोज ३ अमेरिकन डॉलर्सपर्यंत सुधारणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles