पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर ए तोयबा आणि अन्य दहशतवादी कॅम्पवर थेट मिसाईल हल्ले करत ते कॅम्प ध्वस्त करण्याची अभिमानास्पद कारवाई मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्याने केली.
दहशतावाद्यांच्या एकूण नऊ तळांवर हल्ला करत कुख्यात मसूद अजहर व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांसहअनेक दहशतवादी, ज्यात अब्दुल मलिक, मुदित्सिर या नामवंतांचाही समावेश होता, हे दहशतवादी मारले गेले असल्याचे वृत्त आहे.
पहलगाम मध्ये घरातील मुख्य माणसं मारत बायकांच्या कपाळावरील कुंकू पुसून त्यांना वैधव्य बहाल करणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सूचनेवरून या मोहिमेला ऑपरेशन मिशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते.
पीओके मधील अब्बास कॅम्प, बर्नाला आदी कॅम्प या कारवाईत नष्ट झाले आहेत.
जप्त केलेले आयईडी अतिशय हुशारीने लपवण्यात आले होते, त्यातील दोन स्टीलच्या बादल्यांमध्ये आणि तीन टिफिन बॉक्समध्ये लपवण्यात आले होते. घटनास्थळी सापडलेल्या अतिरिक्त वस्तूंमध्ये युरियाचे पाच पॅकेट, पाच लिटरचा गॅस सिलेंडर, एक दुर्बिण, लोकरीच्या टोप्या, ब्लँकेट आणि इतर विविध साहित्यांचा समावेश होता.
एका वेगळ्या पण संबंधित घडामोडीत, लष्कर-ए-तोयबाच्या स्लीपर सेलमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या इम्तियाज अहमदचा देखील मृत्यू झाला आहे. पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात अहमद वैशो प्रवाहात बुडाल्याचे वृत्त आहे.