भारत आणि पाकिस्तानदरम्यान 7 ते 10 मे पर्यंत लष्करी तणाव राहिला. या लढाईत भारत पाकिस्तानवर वरचढ दिसला. 4 दिवसापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता. या काळात भारताने त्याची कुटनीती आणि रणनीतीचा परिचय दिला. पाकिस्तानच्या सैन्य ठिकाण्यांसह भारताने दहशतवादी तळ अचूक नष्ट केले. तणावानंतर या बु्द्ध पौर्णिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला. नवी दिल्ली कोणत्याही अणु हल्ल्याआड होणारे ब्लॅकमेल सहन करणार नाही असे पाकला त्यांनी ठणकावले.
4 दिवस चालेल्या या तणावाच्या काळात भारताने पाकिस्तानचे अनेक महत्त्वाचे हवाईतळ नष्ट केले. तर पाकिस्तानने भारतावर डागलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवतेच निष्फळ ठरवले. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ने दहशतवादाविरोधातील प्रतिक्रियेचा नवीन आयाम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. भारताने वाळवंटामध्ये आणि डोंगररांगामध्ये क्षमतेचे प्रदर्शन केले आणि नव्या युगाच्या युद्धात श्रेष्ठता सिद्ध केली.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपल्या मेड इन इंडियातील शस्त्रांच्या विश्वासार्हता सिद्ध केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 21 व्या शतकाच्या युद्धात मेड इन इंडिया संरक्षण उपकरणांचा काळण सुरू झाला आहे, असे ते म्हणाले. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताने तर पाकिस्तानच्या चिंधड्या केल्या. भारताने केवळ पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला नाही, तर नव्या युगातील एअर डिफेन्स सिस्टीम वापरून पाकिस्तानचा हल्ला निष्फळ केला. या वृत्तात आकाशतीर आणि एस 400 याचा विशेष उल्लेख केला आहे.