मुंबई (Mumbai) :- राज्यात कुठेही हिंदीची सक्ती केलेली नाही. आम्ही पण सरकारमध्ये बसलेले आहोत. मराठी सक्तीची आहे. हिंदी नको तर संस्कृत (Sanskrit) घ्या असे मत यांनी व्यक्त केले. आम्ही पण मराठी आहोत आम्ही पण हिंदू आहोत हिंदू समाजाला तोडण्यासाठी हे सगळे कार्यक्रम कशाला हातात घेताय, हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी हे जे कार्यक्रम आखलेत त्याला बळी पडू नका असे मत राणे यांनी व्यक्त केले.
एलईडी फिशिंग करणारी कुठलीही बोट त्यांच्या फॅक्टरीत परत सुखरूप जाणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले. गेल्या 6 महिन्यात आमच्या खात्याकडून या सगळ्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे. मी हिंदू धर्म आणि हिंदुत्वासंदर्भात काम करणारा कार्यकर्ता आहे. मला देवाने ताकद द्यावी असेही राणे म्हणाले. नारायण राणे यांनी त्यांच्या कार्यकाळात मच्छीमार बांधवांसाठी केलेलं काम आजही लोक विसरलेले नाहीत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आदर्श काम करत आहेत. पुढची 25, 50,100 वर्ष तेच मुख्यमंत्री राहतील असेही राणे म्हणाले.
मला माझ्या मच्छीमार आणि कोळी बांधवांची चिंता आहे पण कोणाच्या घरातली भांडण मिटून जर ते एकत्र येणार असतील तर समाधानच आहे असे मत नितेश राणे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर व्यक्त केले. शेतकरी आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. स्वतःच्या मुलीला वाईनची फॅक्टरी उघडून देण्यासाठी येणाऱ्या द्राक्षापर्यंतचा संबंध संजय राऊतांचा आहे. गल्लीत बसून भांडुपच्या देवानंदने एवढे मोठे विषय करु नयेत असे राणे म्हणाले.