IAS पूजा खेडकर यांची ऑडी कार बंगल्यातून गायब
पुणे कार्यालयातील वादग्रस्त अधिकारी
पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या आहेत. प्रशिक्षणार्थी असून त्यांना केबिन हवी होती, सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावण्याच्या प्रकारामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या. त्यांना 21 हजार दंड लावण्यात आला. यासंदर्भात त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली. काल पर्यंत त्यांच्या घराबाहेर ही कार उभी होती. मात्र आज ही कार त्यांच्या घराबाहेर दिसत नाही. त्यांच्या घराबाहेरून ही कार गायब झालेली आहे. त्याच बरोबर आणखी एक कर या घराबाहेरून गायब झालेली आहे. त्यामुळं नेमकी ही कार कुठं गेली याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
———–
नाशिकमध्ये बस दरीत कोसळून 2 ठार!
थरार बसमधील प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद
नाशिकमधील सापुतारा घाटातील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटामध्ये रविवारी एक बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा हादरवून टाकणारा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. खरं तर सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस अधिक खडतर होत असून पावसामुळे येथील निसरड्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. असाच एक अपघात रविवारी झाला. प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाला असून एकूण 58 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचा नेमका क्षण बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे
—————-
श्रीहरी अणे यांचं मोठं विधान
कुणाचा होऊ शकतो गेम?
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आता लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आमदारांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचे मतं अशा हिशोबाने मतमोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणी नेमकी कशी होते? . “विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया थोडी किचकट असते. पण थोडक्यात समजवून सांगायचे तर सर्व उमेदवार जितक्या जागा असते तितके उभे राहिले असते तर निवडणुकीचा प्रश्न उभा राहिला नसता. निवडणूक झाली नसती. प्रत्येकाला 1 जागा मिळू शकली असती. पण जिथे निवडणूक लढण्यासाठी जास्त लोकं आलेली आहेत, अशा परिस्थितीत कुणीतरी एलिमिनेट व्हावं लागतं”, असं श्रीहरी अणे यांनी सांगितलं.
——————
भाजपच्या नेत्यांनी केला पंकजा मुंडेंचा गेम
भास्कर जाधवांचं वक्तव्य
गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला होता. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून येतील, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केले. ते शुक्रवारी विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर भास्कर जाधव यांचे उत्तर अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
—————–
महायुतीची भरोशाची विकेट जाणार
संजय राऊतांनी सांगितली ‘अंदरकी बात’
विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी मतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील आजारी असतानाही मतदानासाठी आले होते, तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामुळे निवडणुकीत काटे की टक्कर होताना दिसत आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
—————
विधान परिषद निवडणुकीत ओवैसी, सपा, बच्चू कडू किंगमेकर…
विधानभवनात नाट्यपूर्ण घडामोडींना वेग
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान सुरु झाले आहे. आपआपली मते फुटू नये म्हणून दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसने काळजी घेतली आहे. सर्व पक्षाने आपआपल्या आमदारांना गुरुवारपासून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. स्वबळावर महायुती किंवा महाविकास आघाडीतील कोणताच उमेदवार निवडून येऊ शकत नाही, यामुळे इतर छोट्या पक्षांसोबत अपक्षांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात असदुद्दीन ओवैसी, बच्चू कडू आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांवर सर्वांची नजर आहे. बच्चू कडू यांनी आपले पत्ते उघडले असून शिंदे गटाला मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.
——————
राहुल गांधींची काँग्रेस कार्यकर्त्यांना वॉर्निंग
स्मृती इराणी यांना वाईट बोलणार नाही असा आदेश
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर असभ्य आणि अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांना विरोधीपक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधींनी वॉर्निंग दिली आहे.