Thursday, June 19, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मोदी-शाहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? हिंदीला विरोध

मुंबई (Mumbai) :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय. मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल, असा अध्यादेश समोर आणला. अशातच हिंदी भाषा सक्तीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर भाष्य केलं. तसेच, यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारला हिंदी भाषेबाबत लिहिलेली दोन पत्र वाचून दाखवली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “मी एकाच विषयावर बोलेल जो अत्यंत महत्तवाचा विषय आहे. महाराष्ट्र सरकारनं शैक्षणिक धोरणामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली आहे. 17 तारखेला मी पत्र लिहलं होतं. शैक्षणिक धोरणाविषयी आजची पत्रकार परिषद घेत आहे. हिंदी भाषेबाबत राज्य सरकारला 2 पत्र लिहलीत.

यावेळी राज ठाकरे यांनी त्यांनी सरकारला लिहिलेली आधीची दोन पत्रे वाचून दाखवलीच, पण आज लिहिलेलं तिसरं पत्रही वाचून दाखवलं.आज मी तिसर पत्र देत आहे. राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पाठवत आहे. मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलत होतो त्यांनी आदेश मागे घेत आहोत असं सांगितलं होतं. मी हे पत्र पाच दिवसापूर्वी लिहिलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles