महाराष्ट्र आणि कर्नाटकात ‘रेड अलर्ट’
मुंबई (MUmbai) १५ जुलै:- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उत्तराखंडमध्ये पावसामुळे अडचणी वाढल्या असून, हरिद्वार येथे रविवारी सायंकाळी मुरादाबाद रोडवेजची बस पुलाचे रेलिंग तोडून खाली कोसळली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात पावसामुळे दरडी कोसळणे आणि वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांतील ८.४ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.आज गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागल्याने कल्याण-ठाकुर्लीदरम्यान रेल्वे प्रवास ठप्प झाला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून, रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतर आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे.
लोणावळ्यातील धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असले तरी, जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना बंदी घातली आहे.कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेडमधील जगबुडी, नारंगी, चिपळूणची वशिष्टी, मंडणगडमधील भारज, आणि नागोठण्याची अंबा नद्या पूरग्रस्त झाल्या आहेत. (Heavy Rain) यामुळे रस्ते आणि शेती जलमय झाली आहे. खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरी स्थानकावरून मुंबईला जाण्यासाठी २५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.अलिबाग पनवेल एसटी बसचा कार्लेखिंडी येथे अपघात झाला, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोकणात मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. रत्नागिरी आणि रायगडला ‘रेड अलर्ट’ (‘Red Alert’) जारी करण्यात आला आहे.या पावसामुळे राज्यात परिस्थिती गंभीर असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.