यवतमाळ :- विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात पाच शेतकऱ्याऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि भंडारा जिल्ह्यात एका घटनेचा समावेश आहे. यामागे गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षों बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणे असल्याचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
मागील ४८ तासांत विनोद ढोरे (रा. दाभेविरली, जि. भंडारा), भोजराज राऊत (रा. चोरटी) व नीलकंठ प्रधान (रा.रणमोचन), जि. चंद्रपूर, बन्सी पवार (रा. गांधीनगर) व दादाराव बोबडे (रा. मगनमाळ) जि. यवतमाळ या पाच जणांनी आत्महत्या केली. या वर्षी जूनपर्यंत पश्चिम विदर्भात ६९४, तर पूर्व विदर्भात २२८ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याची माहिती किशोर तिवारी पानी दिली.
विदर्भात आतापर्यंत केवळ ४५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. मागील हंगामात प्रचंड नापिकी झाली. कापूस आणि सोयाबीनला भाय मिळाला नाही. त्यातच दुष्काळ घोषित करण्यात केला नाही. पीकविमाही समाधानकारक मिळाला नाही. यामुळे पश्चिम विदर्भापाठोपाठ आता पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.