राज्यात आरोप-प्रत्यारोपांची धार
व्हिडिओ सार्वजनिक करण्याचे आवाहन
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची धार दिवसागणिक वाढत चालली आहे. फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केल्यानंतर आज देशमुख यांनीही प्रसारमाध्यमांसमोर येत फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं आहे.
अनिल देशमुख म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझे कोणतेही व्हिडिओ नाहीत, फक्त काहीतरी आरोप करायचे म्हणून ते तसे बोलले आहेत. मात्र माझ्यावर वेळ आल्यानंतर किंवा कोणी मला चॅलेंज केल्यानंतर मी पेन ड्राइव्हमधील पुरावे सर्वांसमोर आणणार आहे,” अशा शब्दांत देशमुख यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे. अनिल देशमुख हे उद्धव ठाकरेंबाबत काय बोललेत, शरद पवार यांच्याबाबत काय बोललेत, सचिन वाझेवर काय बोललेत, हे सगळं आहे. माझ्यावर वेळ आली के हे व्हिडिओ मी सार्वजनिक करणार आहे,” असा इशारा काल देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
आता अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजनांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरुन चर्चा घडवून आणली. अजित पवार यांच्याविरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह माझ्याकडे धरण्यात आला. मात्र, आपण त्याला नकार दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.
———-
‘महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही
अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केवळ बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांना अधिक निधी देण्यात आला. इतर राज्यांचा आणि खास करुन महाराष्ट्राचा उल्लेखही करण्यात आला नाही असा आरोप विरोधकांनी केला. या आरोपाला राज्यसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिलं आहे. यावेळेस सीतारमण यांनी राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यावर निशाणा साधला.
———-
पुण्याला 32 वर्षात पहिल्यांदा पावसाने एवढं धु- धु धुतलं
हवामान तज्ज्ञांची माहिती
पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर , भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या ३२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस झाला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
————
पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद
कित्येक वर्षांचा रेकॉर्ड तोडला
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आज जलमय झाली असून पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे. शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग नागरिकांना काढावा लागत आहे. दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून कल्याण, ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे. बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
———-
मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ म्हणणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका
मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली
मराठी माणसाला नोकरीत ‘नो एन्ट्री’ म्हणणाऱ्या कंपनीच्या मालकाने अखेर महाराष्ट्राची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मराठी माणसाला नो एन्ट्री असं या जाहिरातीमधून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट आक्रमक झाल्यानंतर कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली आहे. आर्या गोल्ड कंपनीचे मालक बंटी रुपरेजा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी जनतेचा माफी मागितली आहे.
———–
अखेर खासदार निलेश लंकेंचे उपोषण चौथ्या दिवशी मागे
बाळासाहेब थोरातांची मध्यस्थी यशस्वी
ष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके गेल्या चार दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या विरोधात अहमदनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीला यश आले आहे.खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळ्या असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचा आरोप लंके यांनी पत्रात केला होता. हप्ते गोळा करणार्यांवर पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी निलेश लंके यांनी केली होती.