Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

EC notice : निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेसला नोटीस

प्रचारात दोन्ही पक्षांना जपून बोलण्याचे दिले निर्देश

नवी दिल्ली, 22 मे  : लोकसभा निवडणुकीत जातीय आधारावर मतांचे आवाहन करणे आणि सुरक्षा दलांच्या नावाने मतदारांना भुलवणे यावर निवडणूक आयोगाने आपला आक्षेप व्यक्त केला आहे. या संदर्भात आयोगाने भाजप आणि काँग्रेसला असे करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

निवडणूक आयोगाने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge)यांना नोटीस पाठवली आहे. दोन्ही पक्षांना त्यांच्या स्टार प्रचारकांना लष्करी आणि धार्मिक मुद्दे राजकारणात ओढू नयेत अशा सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना जात, धर्म, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर भाष्य करू नये, अशी आठवण करून दिली आहे.आयोगाने दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांना प्रचारात जातीय भेद निर्माण करणाऱ्या गोष्टी न बोलण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर संविधान रद्द केले जात आहे किंवा विकले जात आहे, अशा गोष्टी बोलल्याबद्दल काँग्रेसला खडसावले आहे आणि भविष्यात असे करू नये असे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकवेळा लष्कर भरतीसाठीच्या अग्निवीर योजनेवर भाष्य केले आहे.

आयोगानेही यावर आपला आक्षेप व्यक्त केला असून सुरक्षा दलांचे राजकारण करू नये, असे काँग्रेसला सांगितले आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेसला आपल्या स्टार प्रचारकांनी अशी विधाने करू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले आहे ज्यामुळे भारताची राज्यघटना रद्द केली जाऊ शकते असा चुकीचा समज दिला जातो यासोबतच निवडणूक आयोगाने भाजप आणि त्यांच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि जातीय आधारावर प्रचार करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles