Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
———–
शिमला, मंडीमध्ये ढगफुटी

एकाचा मृत्यू, 30 जण बेपत्ता

निसर्ग कोपतो तेव्हा काय होतं, हे वायनाडच्या घटनेनं दाखवून दिलं. आता वायनाडपाठोपाठ हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्यानं हाहाःकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं याला दुजोरा दिला आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूननं देशाच्या मोठ्या भागांत धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (31 जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सुमारे 30 लोक बेपत्ता झाले आहेत. तर, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवालमध्येही ढगफुटीची घटना घडली आहे.

इम्तियाज जलील यांचा कंगणावर प्रहार

नवनीत राणांबद्दल काय म्हणाले?

माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर टीका केली आहे. पहिल्यांदा लोकसभा पाहायला मिळतेय. म्हणून काहीही बोलायचं… मीडियाच्या लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी अनेक लोक असे बोलतात. यादी भाजपची अमरावतीची खासदार होती. तिला माहीत होतं की आपण काहीतरी वेगळं बोललं की मीडियात आपल्याला दाखवतात. मात्र सगळ्यांना माहित आहे की काय झालं. आता ही नवीन बाई आली आहे दररोज काही ना काही तरी बडबड करते, असं इम्तियाज जलील म्हणालेत.
———–
राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

विश्रांतीनंतर जोर पुन्हा वाढणार

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे कोकणातील जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासह मुंबई, ठाणे पालघरमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
———–

भाजप अन् संघाचा एकत्रित सर्व्हे

मुस्लिमबहुल मतदारसंघांसाठी खास स्ट्रॅटेजी

आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सह प्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहेत. मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी बैठका घेऊन भाजपकडून रणनीती ठरवण्यात येणार आहे. मुंबईत कुणाला परत संधी द्यायची, कुणाच्या जागी नवा चेहरा द्यायचे हे ठरवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका मुंबईतल्या काही मतदार संघात बसला यामुळे जास्तीत जास्त हिंदू मतदारापर्यंत पोहोचून जनजागृती भाजपकडून करण्यात येणार आहे.
———-

संसदेत गळती लागली तरी आश्चर्य वाटायला नको

संजय राऊतांच्या हल्लाबोल

तामिळनाडूच्या विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होतोय. शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पावसामुळे गळती लागल्याच दिसतय. छतामधून पाणी गळती सुरु असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. टपकणाऱ्या पाण्यामुळे जमीन ओली होऊ नये, यासाठी जमिनीवर एक बादली ठेवण्यात आली आहे. “बाहेर पेपर लीकेज आणि आता वॉटर लीकेज. राष्ट्रपती वापरतात त्या संसद लॉबीमध्ये पाणी गळती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षात ही स्थिती. या मुद्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार” असं या खासदराने टि्वटमध्ये म्हटलय. काँग्रेस नेत्याने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स वेगवेगळे कमेंट करत आहेत.
———
7 महिन्यांची गर्भवती हातात तलवार घेऊन ऑलिम्पिकच्या मैदानात

सर्वांसाठी ठरली प्रेरणादायी!

सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा सुरु आहे. दररोज विविध खेळाडू आपल्या देशासाठी मेडल जिंकवून देण्यासाठी प्रतिस्पर्धींसोबत दोन हात करताना दिसून येतंय. याचदरम्यान जगाला भावूक करणार क्षण लोकांनी ऑलिम्पिकमध्ये अनुभवला. इजिप्तची नादा हाफिझ ही सात महिन्यांच्या गर्भवती महिला तलवारबाजी स्पर्धेत खेळली. पहिली फेरी जिंकत तिने ऑलिम्पिक दावेदारी कायम ठेवली. जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेल्या एलिझाबेथ तार्ताकोवस्कीला नादा हाफिझने 15-13 अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर तिचा सामना दक्षिण कोरियाच्या जीऑन हायोंगविरूद्ध झाला. ज्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला.
….

मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त कानाकोपऱ्यातून शुभेच्छा

बल्लारपूर,दुर्गापूर, लखमापूर येथे महाआरती

वाढदिवसाच्या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळत आहे. लोकांचे प्रेम मिळत आहे. या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथील बालाजी मंदिरात आयोजित महाआरती प्रसंगी ते बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले की, भगवान बालाजीची आपल्या परिवारावर कृपा आहे. महाराष्ट्रात कोणालाही मिळाला नसेल असा बहुमान भगवान बालाजीने आपल्या परिवाराला दिला आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने माझ्या अर्धांगिनीची नियुक्ती तिरूपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी केली होती. यातून भगवान बालाजीची सेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. केवळ मतदारसंघासाठीच नव्हे तर राज्याच्या हितासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. जनसेवेचे व्रत आपण घेतले आहे. हे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, असेही मुनगंटीवार म्हणाले.

———-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार सोबतीला

नाशिक- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७ व्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या परिषदेत गुजरात, गोवा, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसंच या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत.

——–
राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी प्रथमच महिला अधिकारी

शोमिता विश्वास यांच्याकडे जबाबदारी

महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार बुधवारी (३१ जुलै) रोजी श्रीमती शोमीता विश्वास, भा.व. से. यांनी मावळते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर यांचेकडून नागपूर येथे स्वीकारला.
श्रीमती शोमीता बिश्वास (भावसे) या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीमती विश्वास यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव, पोलिस महासंचालक या पदांपाठोपाठ आता वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी महिला अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे, ही गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles