Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Devendra Fadnavis :गृहखातं भाजपकडेच का हवंय

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

मुंबई (Mumbai) :- विधानसभा निवडणूक निकालात भाजपला विक्रमी १३२ जागांवर विजय मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्याचं मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला गेले.उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला नेमकी कोणकोणती खाती येणार, याबाबत चर्चा रंगत असतानाच आता भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.”तुम्ही २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यापासून संधी मिळेल तेव्हा तुम्ही गृहखातं तुमच्याकडे ठेवलं आहे, आता एकनाथ शिंदेंचीही गृहखात्याची मागणी आहे. हे खातं तुम्ही सोडणार नाही, हे नक्की आहे का?” असा प्रश्न एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “गृह विभाग आमच्याकडे असावा असे फडणवीस म्हणाले

“तुम्ही २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यापासून संधी मिळेल तेव्हा तुम्ही गृहखातं तुमच्याकडे ठेवलं आहे, आता एकनाथ शिंदेंचीही गृहखात्याची मागणी आहे. हे खातं तुम्ही सोडणार नाही, हे नक्की आहे का?” असा प्रश्न एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “गृह विभाग आमच्याकडे असावा, असं आमचं मत आहे.  मागील काही वर्षांत हे खातं आमच्याकडे राहिलेलं आहे आणि गृह विभागाला केंद्रीय गृह मंत्रालयाशीही सतत समन्वय साधावा लागत असतो. कारण राज्यात नक्षलवादाची समस्या आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे. तसं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील केंद्राशी समन्वय साधू शकतात, कारण ते आमचे मित्रपक्षच आहेत. मात्र  मी भाजपचा असल्यामुळे केंद्राशी समन्वय साधणं अधिक सोपं जातं. त्यामुळे हे खातं भाजपकडे राहावं, असा आमचा प्रयत्न असतो,” असं म्हणत फडणवीस यांनी भाजप गृहखातं सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

Mumbai video
Mumbai – wikipedia
Mumbai smat
Mumbai choufer
Mumbai City
Mumbai map
Mumbai Indian
Mumbai Pin Code

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles