Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ कार्यालयाला भेट | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ कार्यालयाला भेट

पंधरा दिवसातली दुसरी भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला आज भेट दिली आहे. संघ कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गेल्या पंधरा दिवसातली ही सलग दुसरी फडणवीसांची भेट आहे. राष्ट्रीय पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असताना या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. साधारण अर्धा तास या बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

———–

वसुली आघाडीचा बुरखा फाटला..!

सचिन वाझे यांचा खळबळजनक आरोप

अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. मी त्यांच्या पीएकडे पैसे देत होतो या बद्दल सर्व माहिती मी फडणवीसांना पत्र लिहून दिली असे वाझे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे .
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या PA मार्फत वसुली करत होते. उध्दव ठाकरे यांचे निकवर्तीय आणि अनिल देशमुख यांचे साथीदार सचिन वाझे याने धक्कादायक माहिती दिली. नार्को टेस्ट करायला देखील मी तयार आहे या शब्दात त्याने वसुली आघाडीचा बुरखा फाडला आहे.संपूर्ण देश जेव्हा कोरोना महामारी सोबत लढत होता तेव्हा महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखरण्यात व्यस्त होती.


 

‘एक तर तू राहशील नाहीतर मी’,

ठाकरेंच्या शिवसेनेने बॅनरबाजीतून फडणवीसांना डिवचले

बॅनरवर उद्धव ठाकरे वाघ बनून डरकाळी फोडत असल्याचे व्यंगचित्र देखील काढण्यात आले. कल्याणमधील खडकपाडा चौक, दूध नाका, बैल बाजार, पार नाका परिसरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहेमहाराष्ट्रातील राजकारणातील स्तर खालवत चालला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सर्व नियम आणि संकेत सोडून हल्ले करत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. ‘एक तर तू राहशील नाहीतर मी’, असे सरळ आव्हान मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठकीत दिले होते. त्यानंतर आता शिवसेना उबाठामधील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा वापर करुन बॅनरबाजी सुरु केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी डिवचले जात आहे. कल्याण पश्चिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

————

टोमॅटोचा भाव आला अर्ध्यावर

पण इतर भाज्या महाग

दोन महिन्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या नाश्त्यासह जेवणात टोमॅटो परत आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोचा भाव वधारल्याने ग्राहकांनी खरेदी कमी केली होती. आता किंमती अर्ध्यावर आल्या आहेत. दोन महिन्यापासून टोमॅटोचा भावाने शंभरी गाठली होती. तर उत्तर भारतात टोमॅटोचा आलेख गेल्यावर्षीप्रमाणे वाढत होता. पण केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला. तर राज्यात टोमॅटोचे उत्पादन वाढले. त्यांची आवक वाढली. मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आल्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागात टोमॅटोचा दर अर्ध्यांहून खाली आला. पण इतर काही भाज्या महागच असल्याचा ग्राहकांचा सूर आहे.

———

केंद्रीय गृहमंत्रालयाची सर्वात मोठी कारवाई

BSF प्रमुखांना पदावरुन हटवले

डीजी बीएसएफ नितिन अग्रवाल 1989 बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहे. तर खुरानिया 1990 बॅचचे ओडिशा केडरचे अधिकारी आहेत. अग्रवाल यांनी मागील वर्षी जून महिन्यात सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली होती. खुरानिया विशेष महानिदेशक (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर असलेल्या सैनिकांचे नेतृत्व करत होते.जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी गेल्या काही दिवसांत अनेक हल्ले केले. त्या हल्ल्यांमध्ये भारताचे जवानही शहीद झाले. अतिरेकी सक्रीय झाल्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. त्यानंतर तातडीने सरकारने पावले उचलत अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

———-

एअर इंडियाचा मोठा निर्णय

विमानांची उड्डाण 8 ऑगस्ट पर्यंत रद्द

“इस्रायल आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर Air India चा मोठा निर्णय. तेल अविवला जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाण 8 ऑगस्ट पर्यंत रद्द. प्रवासी आणि क्रू मेंबरची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे” असं एअर इंडियाने म्हटलं आहे. मध्य पूर्वेमधील देशांमधील तणावाची परिस्थिती पाहता आम्ही हा निर्णय घेत आहोत असं एअर इंडियाने सांगितलं. ज्या प्रवाशांनी तिकीटं काढली होती, ती रद्द केल्यानंतर त्यावरची रक्कम प्रवाशांना पुन्हा दिली जाईल असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles