वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनांवर तोडगा म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅथेटेरायझेशनच्या 19 कॅथ लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया हृदयाशी संबंधित समस्या शोधण्यासाठी आणि रुग्णांना कमी वेदना, कमी धोका आणि जलद पुनर्प्राप्ती होण्यासाठी वरदान आहे.
कॅथलॅब म्हणजे काय?
कॅथ लॅब, ज्याला कार्डियाक कॅथेटेरायझेशन प्रयोगशाळा किंवा कार्डियाक कॅथ लॅब असेही म्हणतात, ही विशेष एक्स-रे उपकरणांनी सुसज्ज असलेली परीक्षा कक्ष आहे. कॅथ लॅबमध्ये, अत्यंत कुशल हृदयरोगतज्ज्ञ हृदयाच्या धमन्या आणि चेंबर्समध्ये प्रवेश करण्यासाठी कॅथेटर नावाच्या पातळ, लवचिक नळ्या वापरतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या आणि संरचना पाहण्यासाठी अँजिओग्राफी आणि अँजिओस्कोपी सारख्या विशेष इमेजिंगचा वापर केला जातो., हृदयविकाराच्या रुग्णांना हाताळणं आणखी सहज होईल. यामुळे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे.
कॅथलॅबची काय मदत होणार?
महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचं कौतुक करताना ज्येष्ठ हृदयविकार तज्ञ डॉ. गौतम म्हणाले की, हृदय विकाराचा झटका हाताळण्यासाठी कॅथ लॅब खूप महत्त्वाच्या आहेत. खरंतर, सध्या प्रत्येक भागात कॅथ लॅब सुरू होणार असून या लॅब निदान आणि उपचार दोन्हींसाठी मदत करतात. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तासाभरात रुग्णालयातल्या कॅथ लॅबमध्ये रुग्ण पोहोचला, तर अँजिओग्राफीनंतर (प्राइमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फेक्शन ट्रायल) देऊन रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
कार्डियाक कॅथेटेरायझेशनची शिफारस
जेव्हा हृदयाची शरीररचना, कार्य आणि रक्त प्रवाह याबद्दल अधिक माहिती आवश्यक असते तेव्हा विविध वैद्यकीय कारणांसाठी कार्डियाक कॅथेटेरायझेशनची शिफारस केली जाते. सामान्य संकेतांमध्ये हे समाविष्ट आहे:
कोरोनरी आर्टरी डिसीज : कोरोनरी धमन्यांमधील अडथळे किंवा अरुंद होण्याच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणे आणि हस्तक्षेपाची आवश्यकता निश्चित करणे.
एनजाइना किंवा छातीत दुखणे: एनजाइना किंवा छातीत दुखण्याचे कारण ओळखणे आणि हृदयाच्या स्नायूमध्ये रक्त प्रवाहाचे मूल्यांकन करणे.
हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फेक्शन): आपत्कालीन परिस्थितीत, हृदयविकाराचा झटका येणा-या ब्लॉकेजचे स्थान आणि तीव्रतेचे त्वरित निदान करणे.
वाल्वुलर हृदयरोग: हृदयाच्या वाल्वच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी, स्टेनोसिस किंवा रेगर्गिटेशनची डिग्री निश्चित करा आणि वाल्व दुरुस्ती किंवा बदलण्याचे मार्गदर्शन करा.
जन्मजात हृदय दोष: जन्मापासून अस्तित्वात असलेल्या रचनात्मक हृदयाच्या विकृतींच्या तीव्रतेचे निदान आणि मूल्यांकन करणे.
अस्पष्ट लक्षणे: श्वास लागणे किंवा धडधडणे यासारख्या अस्पष्ट लक्षणांची तपासणी करणे.
जीवनशैली आणि हृदयविकार
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आताची जीवनशैली, कमी वेळ झोपण्यामुळे शरीर तंद्रुस्त राहत नाही. किमान 6 ते 8 तास चांगली झोप घेणं शरीर प्रकृतीसाठी अतिशय आवश्यक आहे. लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. खाणं-पिणं वेळेत आणि पौष्टिक होत नाही. जास्त जंक फूड खाणं. इतकंच नाहीतर जास्त व्यायाम करण्यामुळेही हृदयविकाराचा धोका जाणवतो.
ईश्वरी देणगीवरच घाला…
प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा, महिलांच्या सौंदर्याचा एक भाग म्हणजे त्यांचे केस. त्याच अमूल्य केसांच्या बाबतीत एक विचित्र आणि चिंताजनक घटना घडली आहे कारण कुठल्याशा गूढ आजारामुळे केस गळती होत असून, बुलढाणा जिल्ह्यातील काही लोकांना फक्त तीन दिवसांत टक्कल पडत आहे.
विचित्र आजार, शेकडो बाधित, गंभीर स्थिती
कथित रोगाने बाधित भागात शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालावद, हिंगणा या गावांचा समावेश असून, महिलांसह शेकडो नागरिक या विचित्र विकाराने बाधित झाले आहेत. अचानक आणि गंभीर केस गळण्याच्या समस्येने संपूर्ण समुदायाला धक्का बसला आहे, रहिवासी घाबरले आहेत आणि समस्येचे निदान नाही त्यामुळे उपायही नाही अशी परिस्थिती आहे.
विकाराची लक्षणे आणि प्रसाराचा वेग
अनेक कुटुंबातील सदस्य या विकाराचा बळी ठरत आहेत. अगोदर डोक्याला खाज येणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोगाच्या वेगाने पसरलेल्या संकटामुळे सरकारच्या प्रतिसादाबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
विकाराची संभाव्य कारणे
1. खाजगीत उपचार घेत असलेल्या रुग्णांबद्दल, शॅम्पूमुळे असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे प्राथमिक मत आहे, मात्र आयुष्यात कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस गळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
2. पाण्याचा स्त्रोत दूषित आहे का? याची देखील चाचपणी होत आहे. तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
3. काही रुग्णांनी त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता, शुध्दीकरणासाठी पाण्यात मिसळलेल्या क्लोरीनचे प्रमाण अधिक झाल्यास असा प्रकार होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र फक्त तीन दिवसात टक्कल पडण्याईतपत केसगळतीचे तज्ञदेखील आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
4. काही डॉक्टरांच्या मते दूषित पाणी किंवा जास्त कडकपणा असलेले म्हणजे ज्यात जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम विरघळले जाऊ शकते असे पाणी वापरल्यामुळे सुध्धा असे होऊ शकते. जास्तीत जास्त पीपीएम ब्लिचिंग पावडर असलेले पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे. पाणी ब्लीच करताना ब्लीचिंग पावडरचे प्रमाण या मूल्यापेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
जनता गोंधळाच्या आणि यंत्रणा दिशाहीनतेच्या परिस्थितीत
विकार बाधित भागातील नागरिकांच्या मते परिस्थिती चिंताजनक आहे आणि आरोग्य विभागाने यात त्वरित लक्ष देण्याची गरज आहे, पण कथित विकाराचे निदान अद्याप झाले नसल्याने आरोग्य विभाग गोंधळाच्या परिस्थितीत आहे. नागरिकांनी बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाही करून बाधित गावांमध्ये उपचार शिबिरे सुरू करावीत, अशी मागणी केली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाने अद्याप ठोस उपाययोजना जाहीर न केल्याने सरकारच्या प्राधान्यक्रमांवर टीका होत आहे. कारण नागपुरात आढळून आलेल्या एचएमपीव्ही विषाणूचा सामना करण्यावर राज्य सरकार सध्या लक्ष केंद्रित करत आहे.
नागरिकांच्या अपेक्षा आणि शासकीय प्रतिसाद
ही परिस्थिती समोर येत असताना समस्येवर सरकारकडून बाधित रहिवाशांना उत्तरे आणि मदत हवी आहे, त्यामुळे संकट कमी करण्यासाठी आणि प्रभावित भागात सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्यासाठी सरकारचा प्रतिसाद महत्त्वपूर्ण असेल. या तिन्ही गावांमध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याचा सरकारने निर्णय जाहीर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असता, आरोग्य विभागाचे पथक बुलढाण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं पाहून उपचार सुरू करण्यात आले आहे. एकीकडे जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य मंत्री असताना नेमकं अशा घटना पुढे आल्यानंतर उपाययोजना आणि तत्पर पावले का उचलली जात नाहीत, हा देखील एक प्रश्न आहे.
अचानक पसरलेल्या या आजारामुळे आरोग्य विभागही हैराण झाला आहे. याची माहिती तहसील आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर प्रशासनाला दिली आहे. टक्कल पडण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे