नाशिक (Nashik) २४ जून:- मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पहिले स्वतःचा अभ्यास करावा आणि मगच आपण काय मागणी करतो आहे ती करावी. कारण अभ्यास न करता केलेली मागणी ही चुकीची आहे. याचे भान त्यांना नसते उगाच काहीतरी बोलायचे म्हणून ते बोलतात असा आरोप राज्याचे पुरवठा मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळ हे नाशिक दौऱ्यावरती आहेत.
पत्रकारांशी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “जे ओबीसींच्या समकक्ष आहेत त्यांना आरक्षण मिळत आहे. त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही.जे आता मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करताय त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना म्हणावं आधी अभ्यास करा. मुस्लिम समाजाला २५ वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी जरांगे मागण्या करत असल्याचे म्हणत भुजबळांनी निशाणा साधला आहे.
तसेच २५ वर्षांपूर्वी ओबीसीतून कुरेशी, बागवान या घटकांना आरक्षण दिले आहे. दिलीपकुमार यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. त्याच वेळी इकडाचा व्यवसाय तिकडा व्यवसाय साम्य असणाऱ्यांना आरक्षण दिले गेले. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके आम्ही सगळे ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी एकत्रित आहोत, असे देखील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)म्हणाले.