Monday, June 23, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

प्रधानमंत्री पिक विमा अन्तर्गत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत

भंडारा : भंडारा जिल्ह्यात पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कोणाला 1 हजार तर कोणाला 1500 रुपये विमा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. दरवर्षी शेतात लावलेल्या पिकांचे अस्मानी संकटामुळे नुकसान होते. त्यामुळे कुठं तरी शेतकऱ्यांना मदत होईल या उद्देशाने सरकारने प्रधानमन्त्री पीक विमा 1 रूपयात काढला. शेतकऱ्यांनी मोठं मोठ्या रांगा लावुन विमा काढला.

खरिप हंगाम 2023 – 24 मध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं धान पिक पाण्याखाली गेलं त्यामुळे मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांचं नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी म्हणुन सरकारने चोलामण्डल कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असा शेतकऱ्यांनी नोंदणी केली. पण आता याच नुकसानीचे पंचनामे झाले. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले असुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. खताची बॅग आज घडीला 1300 रुपयाला मिळतं असताना देखिल नुकसान भरपाई मात्र 1000 रुपये शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सरकार करत असल्याचं आरोप केला जात आहे.
या विषयी कृषि विभागाशी संपर्क केला असताना त्यांनी सांगितले की, चोला मण्डल वीमा कंपनीने सर्वे केला आहे. त्या सर्वेनुसार शेतकऱ्यांचं कापून ठेवलेलं धान पिक नुकसान झालं असेल अशाच क्षेत्रातील बाधित शेतक-यांना मोबदला देण्यात आला . पण कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles