भंडारा : उपविभागीय पोलीस कार्यालय तुमसर यांच्या वतीने 14 मे ते 21 मे या कालावधीत वाहतूक जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती मोहिमेत उपविभागीय अधिकारी आय पी एस रश्मिता राव स्वत: शहरात फिरून नागरिकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. ज्यामध्ये तुमसर शहरातील नागरीक शहरात आपली जबाबदारी पार पाळावे व शहरात वाहतुकीची समस्या उद्भवत होणार नाही.
वाहतुकीचे सर्व नियम पाळून वाहतुकीशी संबंधित समस्या निर्माण होऊ नयेत. तसेच या वाहतूक जनजागृती मोहीम मध्ये बाजारपेठ परिसरासारख्या गर्दीच्या ठिकाणी आपली वाहने कुठ पार्क करायची याची माहिती देण्यात आली, जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही,हे या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.नगरपरिषद, पोलीस विभाग व स्वतः नागरिकांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचे आयोजन 14 मे ते 21 मे या कालावधीत करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांनी जागरूकता निर्माण करून वाहने रस्त्यावर ठेवू नयेत ज्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये तसेच अशा वाहनांना चालनाही देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. उपविभागीय अधिकारी IPS रश्मिता राव यांनी दिली. पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.