देशभरातील रेल्वे ट्रॅक ठप्प करण्याची घोषणा
हरियाणात महापंचायतीनंतर शेतकऱ्यांचा निर्णय
हरियाणातील कुरुक्षेत्र येथे रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या महापंचायतीत ३ ऑक्टोबरला संपूर्ण देशात रेल्वे ट्रॅक रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरियाणात पंचायती घेऊन भाजपने शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराची आठवण करून दिली जाईल.
पंचायती घेऊन आम्ही हरियाणातील शेतकऱ्यांना त्यांच्यावर बळाचा वापर कसा झाला आणि शेतकरी शुभकरन कसा शहीद झाला याची आठवण करून देत आहोत. पिपली बाजारात झालेल्या महापंचायतीला शेतकरी पोहोचले. गाड्या २ तास थांबवल्या जातील पंढेर म्हणाले की, 3 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतभर रेल्वे ट्रॅक 2 तास रोखण्यात येणार आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अधिक गती दिली जाईल.
————-
शेवटी आपण भारतीय
शरद पवारांचे मत
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे. जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय आहोत असं विधान शरद पवार यांनी आरक्षण आंदोलनावर केलं आहे.
———-
सत्यपाल मलिक यांचा मविआला पाठिंबा
उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर घेतली भेट
राज्याची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ही भेट झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मलिक यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्तेवरून पायउतार करणार असा दावा देखील त्यांनी केला.
———-
ममता बॅनर्जींचे पंतप्रधानांना पत्र
सर्व करार रद्द करण्याचा इशारा
पश्चिम बंगालमधील पुरावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना आणखी एक पत्र लिहिले आहे. 2 दिवसांत लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ममतांनी आरोप केला आहे की, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने त्यांच्याशी सल्लामसलत न करता पाणी सोडले, बंगालमधील ५० लाख नागरिकांना पुराचा फटका बसल्याचे नमूद करतानाच या पूरसंकटातून वाचवण्यासाठी केंद्रीय निधीतून त्वरित मदत जाहीर करावी, अशी विनंतीही ममता यांनी मोदी यांना पत्रात केली आहे.
———–
काँग्रेस प्रदेशाध्यांकडून महत्त्वाची माहिती
जागावाटपाची चर्चा सुरू
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये जागावाटापाचं सूत्र ठरत आहे. या बैठकांमध्ये कोणता पक्ष किती जागा लढेल? याबाबत चर्चा सुरु आहे. विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं फायनल जागावाटप कधीपर्यंत निश्चित होईल? याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.जागावाटपाची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या 9 – 10 दिवसात चित्र स्पष्ट होईल. महाविकस आघाडीमध्ये कोण किती जागा लढवेल हे महत्वाचे नाही. तर जनतेच्या विरोधात असलेले सरकार सत्तेतून बाहेर काढणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. यावेळी नाना पटोल यांना जागावाटपाचं सूत्र काय ठरलं? याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “काही प्रसारमाध्यमांनी तीनही पक्ष 100-100 जागा लढवेल असे सूत्र सांगितले. जागा 288 जागा असताना हे कसे शक्य आहे?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
———–
खंबाटकी घाटात थरार!
कंटेनर धडकला आठ वाहनांना
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर रविवारी भरधाव कंटेनरने पुढील आठ गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात सात कार व एका रिक्षाचा चुराडा झाला, तर पाच जण जखमी झाले. या अपघातामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून रविवारी ‘एस’ वळणावरून जाताना कंटेनर चालकाचा ताबा सुटला. यामुळे कंटेनरने पुढे चाललेल्या सहा वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही वाहने एकमेकांना धडकली. वास्तविक रविवारची सुटी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती.दोन्ही बाजूंनी कार चेपल्याने मोठे नुकसान झाले.
————