अण्णा हजारे म्हणाले…
नगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी केला आहे. रोहित पवारांच्या या आरोपाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देत बारामतीतील पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या रोहित पवारांनी असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटले.निवडणुकीत पैशाचे वाटप झाल्याच्या प्रश्नावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे Anna Hazare
यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मतदानसाठी पैशाचा वापर होणं याच्यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही पैसे वाटत असाल तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी बलिदान केले, त्याचे काय ? असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला.देशाच्या स्वातंत्र्यासाठी अबाधित ठेवायचे असेल तर मतदारांची जबाबादारी मोठी आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही तेव्हा येईल जेव्हा मतदार जागृक होईल. पैशाच्या जोरावर देश चालला तर देशातील लोकशाही संपून जाईल, अशी भीती हजारेंनी व्यक्त केली. चारित्र्यवान मतदार पाहूनच मतदान करा, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केला.
देश उद्धवस्त
मतदारांचा चारित्र्यवान, विचार आणि स्वच्छ प्रतिमेचा असावा हे सांगताना अण्णा हजारे यांनी देशाची चावी कोणाच्या हातात द्यायची हे आपल्याला ठरवायचे आहे. चुकीच्या हातात चावी दिली तर देश उद्ध्वस्त होईल, अशी भीती देखील अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.