अमरावती १९ जून:- अमरावती शहर पोलीस, अमरावती जिल्हा (ग्रामीण) पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांच्या रिक्त पदासाठी आज सकाळ पासून भरती प्रक्रिया सुरू कऱण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४९९ जागांसाठी ५२ हजार ४०१ उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात ७४ पदांसाठी, ग्रामीणमध्ये १९८२ पोलीस पदांसाठी व चालकाच्या ९ पदांसाठी आणि एसआरपीएफमध्ये (SRPF) २१८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे,अमरावती शहर आयुक्तालयात एकूण ७४ पोलीस पदांसाठी एकूण ४ हजार ७८९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. १९ ते २४ जून या कालावधीत या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे आणि शॉटपुट यांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे महिला उमेदवारांसाठी १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे आणि शॉटपुटसाठी चाचण्या घेण्यात येणार आहेत.
तसेच ज्या उमेदवारांनी एकाच वेळी बँड पोलीस व चालक पदाकरिता अन्य ठिकाणी अर्ज केला असेल तर अशा उमेदवारांना चार दिवसाची सवलत देण्यात येणार आहे. दिवसाची त्यांना संबंधित उमेदवारांना आयुक्तालयातून पत्र घेणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज केलेला आहे त्यांना आयुक्तालयातून प्रवेशपत्रे मिळाली.आहेत. तसेच पावसाळा पाहता बाहेर गावावरून आलेल्या उमेदवारांची वसंत हॉल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अमरावती शहर पोलिसांची भरती पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हात आहे तर ग्रामीण पोलिसांची भरती हि जोग स्टेडियम या ठिकाणी होत आहे दोन्ही ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ग्रामीण पोलीस मध्ये १९८ आणि चालकासाठी ९ अश्या २०७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ग्रामीण पोलिसांकडे २५ हजार ५४९ अर्ज प्राप्त झाले आहेत.उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार शासकीय नियमानुसार भरती प्रक्रिया निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या शिफारसी यावर अधिकारी करडी नजर ठेवून आहेत.पोलीस भर्ती प्रक्रिया नियमांचे पालन करून पूर्ण होणार आहे. कोणी पैसे मागितले किंवा नोकरी लावून देण्याचे प्रलोभन देत असल्यास तत्काळ संपर्क साधावा किंवा लाचलुचपत विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने कऱण्यात आले आहे.