Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

अमरावती जि. प. शाळेच्या २२ विद्यार्थ्यांना विषबाधा

अमरावती | मोर्शी तालुक्यातील अडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जवळपास २० ते २२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या ठिकाणी गावातील ८० विद्यार्थी वर्ग १ ते ४ पर्यंत शिक्षण घेत आहेत. यामध्ये ६ ते १० वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शाळेचा वेळ सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत असा आहे. गावातील विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेले असता दररोज देण्यात येणाऱ्या पोषण आहारात विद्यार्थ्यांना खिचडी व मोट देण्यात आली. शनिवारी दुपारी 1 वाजता शाळेला सुट्टी झाल्यावर सर्व विद्यार्थी आपापल्या घरी परतले. मात्र, रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान २२ विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, संडास पालकवर्गात कमालीची धावस्यामुळे झाली. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डहाणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले यांना दिली. त्यांनी लगेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल व विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम घटनास्थळी रवाना केली. या अगोदर गावातील डॉ. गणोरकर यांनी सुद्धा विषबाधा रुग्णांवर औषधोपचार सुरू केला होता. आरोग्य केंद्राची टीम घटनास्थळी रवाना केली. या अगोदर गावातील डॉ. गणोरकर यांनी सुद्धा विषबाधा रुग्णांवर औषधोपचार सुरू केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles