दहा सप्टेंबरपर्यत महायुतीचे जागा वाटप पूर्ण होईल
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती
लोकसभा निवडणुकीवेळी झालेला विलंब टाळून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरात लवकर जागावाटप उरकण्याचा निर्णय सत्तारूढ महायुतीने घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर येत्या १० दिवसांत जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. महायुतीची शनिवारी बैठक झाली. त्यामध्ये जागावाटपावर चर्चा झाली. काही जागांवर आमचे एकमत झाले आहे. बैठकीत कुठलीही आकडेवारी मांडण्यात आली नाही. जिंकण्याची क्षमता विचारात घेऊन जागांचे वाटप होईल. महायुतीचे अनेक मित्रपक्ष आहेत
———–
भाजपाचं 1 मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही
भाजपच्या नेत्याचं वक्तव्य
भारतीय जनता पक्षाचे एकही मत राष्ट्रवादीला पडणार नाही असा निर्धार लातूर ग्राणीच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादीमधील दरी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा अहमदपूरला आली होती. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील वाद उफाळून आल्याचं समोर आले आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, निधी वाटपात कायमच भाजपला डावलले गेल्यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली.
इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्याहून छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं, असे एक भाषण दाखवा
देवेंद्र फडणवीसांचे मविआला आव्हान
महाविकास आघाडीचे हे आंदोलन पूर्ण शुद्ध पद्धतीने राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडीला माझा सवाल आहे की त्यांनी लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतलं असे इंदिरा गांधी यांचं एक तरी भाषण दाखवाव, पंडित नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार का? इतके वर्ष काँग्रेसने शिवाजी महाराजांनीसुरत लुटलं असा इतिहास शिकवला, शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, मात्र जाणीवपूर्वक आम्हाला तसा इतिहास शिकवण्यात आला. त्याबद्दल हे लोक माफी मागणार का? मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर ने हटवण्याचे पाप काँग्रेसने केलं, त्याची महाविकास आघाडी माफी मागणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकस आघाडीवर निशाणा साधलाय.
———–
तृतीयपंथींसाठी ‘केईएम’मध्ये ओपीडी
‘सखी चारचौघी’ सह पहिलाच प्रयोग
भारतातील तृतीयपंथी समुदायाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांपैकी यूरोलॉजिकल आरोग्य समस्या विशेषतः गंभीर असतात. लिंगसंबंधी शस्त्रक्रिया करणाऱ्यांसाठी किंवा करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया आव्हानात्मक असते. तृतीयपंथींच्या शस्त्रक्रियेनंतर मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रमार्गातील गुंतागुंत आणि लघवीशी संबंधित समस्या उद्भवातत. मूत्रमार्गात कडकपणा, फिस्टुला आणि संसर्गचा धोका असतो.रुग्णालयात तृतीयपंथीसाठी दर शनिवारी ही ओपीडी असेल. यासंदर्भातील नुकतीच गौरी सावंत आणि तृतीयपंथी समुदायातील सदस्यांसोबत बैठक झाली. त्यांना लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी प्रशासन म्हणून प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय यांनी दिली.
————
बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात…..
पंकजा मुंडे संतापल्या
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यानेच दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचं उघड झाल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला होता. यानंतर राज्यभरात अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याच्यारांच्या घटनांविरोधात भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
————
दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ
PM मोदी ठरवणार
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात संपूर्ण क्रिकेट जगताला उत्सुकता आहे. कारण आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून जय शाह यांची नियुक्ती झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतची सर्व समीकरणे बदललेली दिसत आहेत. आता यादरम्यान पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू बासित अली याने चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल भारताच्या पंतप्रधानांचे नाव घेत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
———–
या भाजप नेत्याला ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर
राष्ट्रपतींच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान
राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३. ३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, उपस्थिती, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पाहून पुरस्कारांसाठी प्रविण दरेकर यांची निवड करण्यात आली
———-
विमानात बॉम्बची धमकी
अखेर विमानाचे नागपुरात आप्तकालीन लँडींग
काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली होती. आता इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी आली. यामुळे मध्य प्रदेशातील जबलपूर येथून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर आप्तकालीन लँडींग करण्यात आले. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. विमान नागपूरला उतरवल्यानंतर कठोर तपासणी करण्यात आली. त्यात काहीच आढळून आले नाही. आता धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
————
महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जोरदार आंदोलन
चंद्रकांत खैरेंचे वादग्रस्त वक्तव्य
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. रविवारी राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, असे अशी मुक्ताफळे उधळल्याने खळबळ उडाली आहे. मालवण येथील पुतळा पडल्यापासून महाविकास आघाडी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सरकारविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करत आहेत. दरम्यान, आज मविआने राज्यात राज्य सरकारला जोडे मारो आंदाेलन छेडले होते. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले.
————-