Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

विजयानंतर हार्दिक पांड्या मनातलं बोलला

टीम इंडियाने काल वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या(Hardik Pandya) मोकळेपणाने बोलला. महिन्याभरापूर्वी याच हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवरुन ट्रोल करण्यात येतं होतं. पण तोच हार्दिक आता हिरो बनलाय. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्याने जी कामगिरी केली, त्याता तोड नाही. कारण अशा टेन्शनमध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी एका वेगळ्या स्तराची मानसिक कणखरता लागते.

ब्रिजटाऊनच्या केंसिंग्टन ओवल मैदानात टीम इंडियाने काल एक नवीन अध्याय लिहिला. अटी-तटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकला. याआधी टीम इंडियाने 2007 साली पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या विजयात ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने फायनल मॅचमध्ये गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केलं. 3 ओव्हर्समध्ये 20 धावा देऊन 3 विकेट काढल्या. हार्दिकने लास्ट ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आवश्यक असलेल्या 16 धावा करु दिल्या नाहीत. हार्दिकने हेनरिक क्लासेन, डेविड मिलर आणि कगिसो रबाडा यांचे विकेट काढले. मिलर सारख्या धोकादायक फलंदाजाला लास्ट ओव्हरमध्ये तंबूत पाठवलं. यामध्ये त्याला सूर्यकुमार यादवने महत्त्वाची साथ दिली. सूर्याने बाऊंड्री लाइनवर मिलरचा पकडलेला झेल कायमस्वरुपी क्रिकेट चाहत्यांच्या मनात कोरला गेला.

हार्दिकने या वर्ल्ड कपमध्ये बॅट आणि बॉलने जबरदस्त प्रदर्शन केलं. हार्दिकने आपल्या टीकाकारांची तोंड बंद केली. महिन्याभरापूर्वी आयपीएलचा सीजन संपला. त्यावेळी मुंबई इंडियन्सने अत्यंत खराब प्रदर्शन केलं. त्यासाठी हार्दिकला जबाबदार धरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता हार्दिकने देशासाठी जे केलं, त्याच कौतुक कराव तेवढ कमी आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर इमोशनल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles