शेवटी पांडुरंगालाच काळजी!
विठ्ठलाच्या नामाचा गजर करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेन चालले आहेत. वारकऱ्यांनी आपल्या विठुरायाचं नाव घेत संपूर्ण वातावरण भक्तीमय केलंय. ऊन, पाऊसाचा विचार न करता अगदी वयाची 75 गाठलेला वृद्धही मोठ्या उत्साहाने वारीमध्ये सहभागी झालेला दिसतो. आपल्या देवाचं नामस्मरण करताना स्वत:ला काय होईल याची पर्वा न करता टाळकरी, वारकरी आणि सगळेच भक्त पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत राहतात. त्यामुळे या वारकऱ्यांवर एखादे संकट आले तरी देवसुद्धा त्यांच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. अशातच एक अशी घटना घडली ज्यामुळे मोठा अनर्थ टळता टळता राहिला
दिंडी क्रमांक 78 मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुकी होता. वारकऱ्यांनी जाताना आपल्या दिंडीतील स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर आणले होते. पण सताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. वारकरी घाबरले कारण सिलेंडरची आग काही प्रमाणात वाढत होती. काही वारकऱ्यांनी हिंमत दाखवत त्यावर वाळू फेकत ती आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग पूर्णपणे विझली नाही. त्यानंतर या आगीबद्दल वाऱ्याच्या वेगाने आग्निशमन दलाच्या जवानांना ही माहिती समजली.
.