भंडारा, २५ मे, : वाढत्या तापमानाचा परिणाम माणसांसह पशू-पक्ष्यांवरही होत आहे.सद्यस्थितीत जंगलामध्ये अन्न आणि पाण्याचा पुरेसा साठा शिल्लक राहत नसल्यामुळे माकडांनी आपला मोर्चा शहरी भागाकडे वळवला आहे.भंडारा शहरातील गणेशपूर येथील गायत्री वार्ड येथे माकडांनी उच्छाद मांडला असून ही माकडे थेट नागरिकांच्या घरात शिरून त्यांच्या सामानांची नासधूस करत आहेत तर या माकडांनी गणेशपूर येथील दोन महिलांना जखमी केले आहे.सविता डुंभरे आणि शेंद्रे अशी जखमी महिलांची नावे आहेत.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करून जखमी महिलांना भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.