अहमदनगर: नगर शहरात रेल्वे स्टेशन रोड वरील प्रभाग ११ मधील सथ्था कॉलनी,नवजीवन कॉलनी,आदिनाथ कॉलनी आदि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याचे पाणी घाण येत असल्याने नगरसेवक अविनाश घुले यांनी तातडीने दखल घेत मनपा पाणी पुरवठा विभागाने दुरुस्ती सुरु केले आहे.यावेळी महापालिकेचे इंजिनिअर राहुल गिते उपस्थित होते.
प्रभाग ११ मधील सथ्था कॉलनी,नवजीवन कॉलनी,आदिनाथ कॉलनी आदि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधून घाण पाणी येत होते.याबाबत येथील नागरिकांनी अविनाश घुले यांना माहिती दिली.त्यांनी तातडीने मनपाच्या पाणी पुरवठा विभाग,आरोग्य विभाग यांच्याशी संपर्क साधून संबंधितांना सूचना दिल्या.त्यानंतर मनपाचे इंजि.राहुल गिते यांनी कर्मचार्यांसह परिसरातील पिण्याची पाईप लाईन व ड्रेनेज लाईन कुठे लिक आहे,फॉल्ट कुठे आहे याची तपासणी करुन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.या दरम्यान नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यात घाण पाणी येत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.परंतु अविनाश घुले यांनी स्वत: उभे राहून हे काम करुन घेतल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.