मुंबई (Mumbai) :- पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी 20 व्या हप्त्याचे 2000 याची वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. मात्र, हे 2000 रुपये विना अडथळा मिळवायचे असतील तर ई केवायसी करणं आवश्यक आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. योजनेच्या नियमानुसार चार महिन्यांच्या कालावधीनंतर पीएम किसानचा हप्ता दिला जातो.