भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या (Pakistan) हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध नको शांती हवी, असे वक्तव्य इशाक दार (Ishaq Dar) यांनी केले आहे.
जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू. आम्हाला विनाश नको, आम्हाला निधीचा अपव्यय नको. जर त्यांनी थांबवले तर आम्हीही थांबू.पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी होती. जर भारताने या क्षणी थांबले तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि बदला घेणार नाही किंवा काहीही करणार नाही.आम्हाला खरोखर शांतता हवी आहे, असे इशाक दार यांनी म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इशाक दार यांनी भारताविरोध वक्तव्य करुन वातावरण तापवले होते. मात्र, आता त्यांच इशाक दार यांनी, ‘आम्हाला आता लढायचं नाही, भारत थांबला तर आम्ही थांबू’, अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भारत (India)आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या चार दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तोफांनी, क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने मारा केला जात आहे. भारताने सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता भारत टप्प्याटप्प्याने ही मोहीम पुढे नेत आहे. दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला सैन्याने तेव्हा पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रं नष्ट करुन भारताने या हल्ल्याला सरप्रेस केले. त्यानंतरही शु्क्रवारीही पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्याने फक्त ‘सप्रेशन’ स्ट्रॅटेजी न वापरता काऊंटर अटॅक केला. भारतीय सैन्याचे पहिले धोरण (सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स) म्हणजे सीड असे होते. आता भारताने डिस्ट्रक्शन ऑफ एनिमी एअर डिफेन्स (DEAD) धोरण वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या कालच्या हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला करुन पाकिस्तानी सैन्याचे हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत.