Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत-अमित शाह

रायगड (Raygad) :- देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले आहे . रायगडावर जाण्यासाठी ते शुक्रवारीच पुण्यात दाखल झाले होते . पुण्यातील रिट्झ कार्लटन हॅाटेल येथे शाह हे मुक्कामाला होते . शासकीय शिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मुरलीधर मोहोळ स्वागतासाठी उपस्थित होते. रात्री ११ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पुण्यात दाखल झाले.

आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) रायगडावरुन संकल्प करत आहोत की आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा आपला देश जगात क्रमांक एकवर असेल. छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आला होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि त्याची कबर इथेच बांधली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत असंही अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने माझ्यासह मंचावर उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), एकनाथ शिंदे, अजित पवार, उदयनराजे, आशिष शेलार यांच्यासह सगळ्यांचं स्वागत करतो. मी राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होतं तिथे मी शिवरायांना अभिवादन केलं त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. स्वराज्य, स्वधर्म यासाठी त्यांना आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहे. मात्र असं साहस मी एकाहीमध्ये पाहिलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles